शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वाहन सातारा पालिकेचं..औषध फवारणी जावळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी सातारा पालिका अहोरात्र झटत असली तरी शहर व वाढीव भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना प्रशासनाची ...

सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी सातारा पालिका अहोरात्र झटत असली तरी शहर व वाढीव भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. मागणी करूनही अनेक भागांत निर्जंतुकीकरण करणारी गाडी चार-चार दिवस फिरकतही नाही. असे असताना सातारा पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जाऊन निर्जंतुकीकरण करून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने प्रशासनाकडून संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. सातारा शहरातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने पालिका प्रशासाने उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. प्रत्येक प्रभागात सोडियम हायपोक्लाराइडद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, शहर व वाढीव भागात ही मोहीम राबविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

सद्यस्थितीत अग्निशमन विभागाची एक गाडी व एका ट्रॅक्टरवरी संपूर्ण शहराची मदार आहे. शिवाय आपला प्रभाग सुरक्षित रहावा, यासाठीदेखील नगरसेवकांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याची स्पर्धा लागली आहे; परंतु मागणी करूनही शहरच काय तर हद्दवाढीत आलेल्या भागात वेळेवर औषध फवारणी केली जात नाही. असे असताना सातारा पालिकेच्या अग्निशमन गाडीने थेट जावळी तालुक्यात निर्जंतुकीकरण मोहीम राबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अग्निशमनच्या गाडीने एप्रिल महिन्यात दोनदा, तर मे महिन्यात दोन वेळा जावळी तालुक्यातील विविध गावांत निर्जंतुकीकरण केले आहे. जावळीपेक्षा सातारा शहर व तालुक्यात निर्जंतुकीकरणाची गरज असताना पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जातात कशा? प्रशासनाकडून याची रितसर परवानगी घेण्यात आली किंवा नाही, निर्जंतुकीकरणाचा खर्च अदा करण्यात आला का? या प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

स्वत:ची व्यवस्था उभारावी

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे सातारा पालिकेने इतर तालुक्यांना जरूर मदत करावी, परंतु शहर व वाढीव भागात उपाययोजना राबविण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. संकट गंभीर असल्याने मेढा नगरपंचायतीनेदेखील तालुक्याची संपूर्ण जबाबदारी घेणे क्रमप्राप्त आहे. निर्जंतुकीकरणासाठी नगरपंचायतीने सक्षम व्यवस्था उभारणेही तितकेच गरजेचे आहे.