शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन सातारा पालिकेचं..औषध फवारणी जावळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी सातारा पालिका अहोरात्र झटत असली तरी शहर व वाढीव भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना प्रशासनाची ...

सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी सातारा पालिका अहोरात्र झटत असली तरी शहर व वाढीव भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. मागणी करूनही अनेक भागांत निर्जंतुकीकरण करणारी गाडी चार-चार दिवस फिरकतही नाही. असे असताना सातारा पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जाऊन निर्जंतुकीकरण करून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने प्रशासनाकडून संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. सातारा शहरातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने पालिका प्रशासाने उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. प्रत्येक प्रभागात सोडियम हायपोक्लाराइडद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, शहर व वाढीव भागात ही मोहीम राबविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

सद्यस्थितीत अग्निशमन विभागाची एक गाडी व एका ट्रॅक्टरवरी संपूर्ण शहराची मदार आहे. शिवाय आपला प्रभाग सुरक्षित रहावा, यासाठीदेखील नगरसेवकांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याची स्पर्धा लागली आहे; परंतु मागणी करूनही शहरच काय तर हद्दवाढीत आलेल्या भागात वेळेवर औषध फवारणी केली जात नाही. असे असताना सातारा पालिकेच्या अग्निशमन गाडीने थेट जावळी तालुक्यात निर्जंतुकीकरण मोहीम राबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अग्निशमनच्या गाडीने एप्रिल महिन्यात दोनदा, तर मे महिन्यात दोन वेळा जावळी तालुक्यातील विविध गावांत निर्जंतुकीकरण केले आहे. जावळीपेक्षा सातारा शहर व तालुक्यात निर्जंतुकीकरणाची गरज असताना पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जातात कशा? प्रशासनाकडून याची रितसर परवानगी घेण्यात आली किंवा नाही, निर्जंतुकीकरणाचा खर्च अदा करण्यात आला का? या प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

स्वत:ची व्यवस्था उभारावी

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे सातारा पालिकेने इतर तालुक्यांना जरूर मदत करावी, परंतु शहर व वाढीव भागात उपाययोजना राबविण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. संकट गंभीर असल्याने मेढा नगरपंचायतीनेदेखील तालुक्याची संपूर्ण जबाबदारी घेणे क्रमप्राप्त आहे. निर्जंतुकीकरणासाठी नगरपंचायतीने सक्षम व्यवस्था उभारणेही तितकेच गरजेचे आहे.