शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाहन सातारा पालिकेचं..औषध फवारणी जावळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी सातारा पालिका अहोरात्र झटत असली तरी शहर व वाढीव भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना प्रशासनाची ...

सातारा : कोरोना प्रतिबंधासाठी सातारा पालिका अहोरात्र झटत असली तरी शहर व वाढीव भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. मागणी करूनही अनेक भागांत निर्जंतुकीकरण करणारी गाडी चार-चार दिवस फिरकतही नाही. असे असताना सातारा पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जाऊन निर्जंतुकीकरण करून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने प्रशासनाकडून संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. सातारा शहरातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने पालिका प्रशासाने उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. प्रत्येक प्रभागात सोडियम हायपोक्लाराइडद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, शहर व वाढीव भागात ही मोहीम राबविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

सद्यस्थितीत अग्निशमन विभागाची एक गाडी व एका ट्रॅक्टरवरी संपूर्ण शहराची मदार आहे. शिवाय आपला प्रभाग सुरक्षित रहावा, यासाठीदेखील नगरसेवकांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याची स्पर्धा लागली आहे; परंतु मागणी करूनही शहरच काय तर हद्दवाढीत आलेल्या भागात वेळेवर औषध फवारणी केली जात नाही. असे असताना सातारा पालिकेच्या अग्निशमन गाडीने थेट जावळी तालुक्यात निर्जंतुकीकरण मोहीम राबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अग्निशमनच्या गाडीने एप्रिल महिन्यात दोनदा, तर मे महिन्यात दोन वेळा जावळी तालुक्यातील विविध गावांत निर्जंतुकीकरण केले आहे. जावळीपेक्षा सातारा शहर व तालुक्यात निर्जंतुकीकरणाची गरज असताना पालिकेच्या गाड्या जावळी तालुक्यात जातात कशा? प्रशासनाकडून याची रितसर परवानगी घेण्यात आली किंवा नाही, निर्जंतुकीकरणाचा खर्च अदा करण्यात आला का? या प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

स्वत:ची व्यवस्था उभारावी

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे सातारा पालिकेने इतर तालुक्यांना जरूर मदत करावी, परंतु शहर व वाढीव भागात उपाययोजना राबविण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. संकट गंभीर असल्याने मेढा नगरपंचायतीनेदेखील तालुक्याची संपूर्ण जबाबदारी घेणे क्रमप्राप्त आहे. निर्जंतुकीकरणासाठी नगरपंचायतीने सक्षम व्यवस्था उभारणेही तितकेच गरजेचे आहे.