शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेळेच्या बंधनात अडकला भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू ...

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू लागले आहेत, तर सायंकाळच्या वेळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. नेमके त्याच वेळी बाजारपेठ व व्यवहार बंद होत असल्याने भाज्या पडून राहत आहेत, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

जिल्ह्यात तरकारीचे मोठे क्षेत्र आहे. सातारा तालुक्यासह जावळी, कोरेगाव, खटाव या तालुक्यातील अनेक शेतकरी तरकारीच भाजीपाला घेतात. सातारा बाजार समितीत तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेतमाल येतो. दररोज ५० ते ६० वाहनांतून शेतमाल येतो, पण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दरावर परिणाम होऊ लागला आहे.

उन्हाळ्यात भाज्यांना मागणी असते, तसेच पुरवठा कमी होतो. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे, पण सध्या भाजीपाला उपलब्ध असला, तरी शेतकऱ्यांसाठी नाराजीचे वातावरण आहे. कारण कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतमालाला मागणी कमी आहे. सातारा बाजार समितीत तर दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असला, तरी दर कमी होत चालले आहेत. व्यापारी भाजीपाला घेतात, पण पुढे ग्राहकच नसेल तर विकायचा कोठे हा प्रश्न आहे. कारण लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळतात. त्यातच सायंकाळी सहापर्यंत मंडई बंद होते. याच दरम्यान, भाज्यांची खरेदी होते, पण लोकांना बाहेरच पडता येत नसल्याने भाजीपाला विक्री कमी झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुणे, मुंबईच्या बाजार समितीत भाजीपाला पाठवितात. तेथेही अशीच स्थिती आहे, कारण शेतमाल पाठविला आणि खरेदी केलाच नाही, तर पदरमोड करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईला शेतमाल पाठविण्याचे धाडसच केले नाही. त्यातच भाज्यांचे दर उतरू लागले आहेत. अशा वेळी शेतमाल बाहेर पाठविणे धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकरी जमेल, तसा भाजीपाला विक्री करु लागले आहेत, तरीही अपेक्षित दर येताना दिसून येत नाही.

चौकट :

विक्रीच्या प्रमाणात खरेदी...

सातारा शहरात दररोज सायंकाळी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी असते, तसेच याच वेळी राजवाडा परिसरात अनेक वाहनांतून भाजीपाला विकण्यात येतो. त्यामुळे शेतमाल बघता-बघता विकला जातो, पण कोरोनामुळे सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार बंद होतात. परिणामी, भाजीपाला विक्रीच होत नाही. त्यामुळे व्यापारीही विक्रीच्या प्रमाणात भाजीपाला घेताना दिसून येत आहेत. त्यातच काही व्यापारी आता ठरलेल्या दरापेक्षा कमी भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

................................................................