शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वेळेच्या बंधनात अडकला भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू ...

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू लागले आहेत, तर सायंकाळच्या वेळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. नेमके त्याच वेळी बाजारपेठ व व्यवहार बंद होत असल्याने भाज्या पडून राहत आहेत, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

जिल्ह्यात तरकारीचे मोठे क्षेत्र आहे. सातारा तालुक्यासह जावळी, कोरेगाव, खटाव या तालुक्यातील अनेक शेतकरी तरकारीच भाजीपाला घेतात. सातारा बाजार समितीत तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेतमाल येतो. दररोज ५० ते ६० वाहनांतून शेतमाल येतो, पण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दरावर परिणाम होऊ लागला आहे.

उन्हाळ्यात भाज्यांना मागणी असते, तसेच पुरवठा कमी होतो. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे, पण सध्या भाजीपाला उपलब्ध असला, तरी शेतकऱ्यांसाठी नाराजीचे वातावरण आहे. कारण कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतमालाला मागणी कमी आहे. सातारा बाजार समितीत तर दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असला, तरी दर कमी होत चालले आहेत. व्यापारी भाजीपाला घेतात, पण पुढे ग्राहकच नसेल तर विकायचा कोठे हा प्रश्न आहे. कारण लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळतात. त्यातच सायंकाळी सहापर्यंत मंडई बंद होते. याच दरम्यान, भाज्यांची खरेदी होते, पण लोकांना बाहेरच पडता येत नसल्याने भाजीपाला विक्री कमी झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुणे, मुंबईच्या बाजार समितीत भाजीपाला पाठवितात. तेथेही अशीच स्थिती आहे, कारण शेतमाल पाठविला आणि खरेदी केलाच नाही, तर पदरमोड करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईला शेतमाल पाठविण्याचे धाडसच केले नाही. त्यातच भाज्यांचे दर उतरू लागले आहेत. अशा वेळी शेतमाल बाहेर पाठविणे धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकरी जमेल, तसा भाजीपाला विक्री करु लागले आहेत, तरीही अपेक्षित दर येताना दिसून येत नाही.

चौकट :

विक्रीच्या प्रमाणात खरेदी...

सातारा शहरात दररोज सायंकाळी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी असते, तसेच याच वेळी राजवाडा परिसरात अनेक वाहनांतून भाजीपाला विकण्यात येतो. त्यामुळे शेतमाल बघता-बघता विकला जातो, पण कोरोनामुळे सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार बंद होतात. परिणामी, भाजीपाला विक्रीच होत नाही. त्यामुळे व्यापारीही विक्रीच्या प्रमाणात भाजीपाला घेताना दिसून येत आहेत. त्यातच काही व्यापारी आता ठरलेल्या दरापेक्षा कमी भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

................................................................