शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

वेळेच्या बंधनात अडकला भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू ...

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू लागले आहेत, तर सायंकाळच्या वेळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. नेमके त्याच वेळी बाजारपेठ व व्यवहार बंद होत असल्याने भाज्या पडून राहत आहेत, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

जिल्ह्यात तरकारीचे मोठे क्षेत्र आहे. सातारा तालुक्यासह जावळी, कोरेगाव, खटाव या तालुक्यातील अनेक शेतकरी तरकारीच भाजीपाला घेतात. सातारा बाजार समितीत तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेतमाल येतो. दररोज ५० ते ६० वाहनांतून शेतमाल येतो, पण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दरावर परिणाम होऊ लागला आहे.

उन्हाळ्यात भाज्यांना मागणी असते, तसेच पुरवठा कमी होतो. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे, पण सध्या भाजीपाला उपलब्ध असला, तरी शेतकऱ्यांसाठी नाराजीचे वातावरण आहे. कारण कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतमालाला मागणी कमी आहे. सातारा बाजार समितीत तर दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असला, तरी दर कमी होत चालले आहेत. व्यापारी भाजीपाला घेतात, पण पुढे ग्राहकच नसेल तर विकायचा कोठे हा प्रश्न आहे. कारण लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळतात. त्यातच सायंकाळी सहापर्यंत मंडई बंद होते. याच दरम्यान, भाज्यांची खरेदी होते, पण लोकांना बाहेरच पडता येत नसल्याने भाजीपाला विक्री कमी झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुणे, मुंबईच्या बाजार समितीत भाजीपाला पाठवितात. तेथेही अशीच स्थिती आहे, कारण शेतमाल पाठविला आणि खरेदी केलाच नाही, तर पदरमोड करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईला शेतमाल पाठविण्याचे धाडसच केले नाही. त्यातच भाज्यांचे दर उतरू लागले आहेत. अशा वेळी शेतमाल बाहेर पाठविणे धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकरी जमेल, तसा भाजीपाला विक्री करु लागले आहेत, तरीही अपेक्षित दर येताना दिसून येत नाही.

चौकट :

विक्रीच्या प्रमाणात खरेदी...

सातारा शहरात दररोज सायंकाळी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी असते, तसेच याच वेळी राजवाडा परिसरात अनेक वाहनांतून भाजीपाला विकण्यात येतो. त्यामुळे शेतमाल बघता-बघता विकला जातो, पण कोरोनामुळे सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार बंद होतात. परिणामी, भाजीपाला विक्रीच होत नाही. त्यामुळे व्यापारीही विक्रीच्या प्रमाणात भाजीपाला घेताना दिसून येत आहेत. त्यातच काही व्यापारी आता ठरलेल्या दरापेक्षा कमी भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

................................................................