शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वेळेच्या बंधनात अडकला भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू ...

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कारण शेतमाल भरपूर असला, तरी व्यापारी दर पाडू लागले आहेत, तर सायंकाळच्या वेळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. नेमके त्याच वेळी बाजारपेठ व व्यवहार बंद होत असल्याने भाज्या पडून राहत आहेत, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

जिल्ह्यात तरकारीचे मोठे क्षेत्र आहे. सातारा तालुक्यासह जावळी, कोरेगाव, खटाव या तालुक्यातील अनेक शेतकरी तरकारीच भाजीपाला घेतात. सातारा बाजार समितीत तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेतमाल येतो. दररोज ५० ते ६० वाहनांतून शेतमाल येतो, पण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दरावर परिणाम होऊ लागला आहे.

उन्हाळ्यात भाज्यांना मागणी असते, तसेच पुरवठा कमी होतो. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे, पण सध्या भाजीपाला उपलब्ध असला, तरी शेतकऱ्यांसाठी नाराजीचे वातावरण आहे. कारण कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतमालाला मागणी कमी आहे. सातारा बाजार समितीत तर दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असला, तरी दर कमी होत चालले आहेत. व्यापारी भाजीपाला घेतात, पण पुढे ग्राहकच नसेल तर विकायचा कोठे हा प्रश्न आहे. कारण लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळतात. त्यातच सायंकाळी सहापर्यंत मंडई बंद होते. याच दरम्यान, भाज्यांची खरेदी होते, पण लोकांना बाहेरच पडता येत नसल्याने भाजीपाला विक्री कमी झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुणे, मुंबईच्या बाजार समितीत भाजीपाला पाठवितात. तेथेही अशीच स्थिती आहे, कारण शेतमाल पाठविला आणि खरेदी केलाच नाही, तर पदरमोड करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईला शेतमाल पाठविण्याचे धाडसच केले नाही. त्यातच भाज्यांचे दर उतरू लागले आहेत. अशा वेळी शेतमाल बाहेर पाठविणे धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकरी जमेल, तसा भाजीपाला विक्री करु लागले आहेत, तरीही अपेक्षित दर येताना दिसून येत नाही.

चौकट :

विक्रीच्या प्रमाणात खरेदी...

सातारा शहरात दररोज सायंकाळी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी असते, तसेच याच वेळी राजवाडा परिसरात अनेक वाहनांतून भाजीपाला विकण्यात येतो. त्यामुळे शेतमाल बघता-बघता विकला जातो, पण कोरोनामुळे सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार बंद होतात. परिणामी, भाजीपाला विक्रीच होत नाही. त्यामुळे व्यापारीही विक्रीच्या प्रमाणात भाजीपाला घेताना दिसून येत आहेत. त्यातच काही व्यापारी आता ठरलेल्या दरापेक्षा कमी भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

................................................................