शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चिमुरड्यांना परसबागेतील भाज्या, सातारा जिल्ह्यातील अंगणवाड्या एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:15 IST

नितीन काळेल ।सातारा : बालमृत्यू, कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला असलातरी सातारा जिल्हा एक पाऊल पुढे आहे. जिल्ह्यातील पन्नासहून अधिक अंगणवाड्यांच्या परिसरात अनेक वर्षांपासून परसबागा आहेत. तेथील भाजीपाल्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होतो.राज्यात बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण आहे. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च ...

ठळक मुद्देबालमृत्यू, कुपोषण निर्मूलनासाठी पुढाकार

नितीन काळेल ।सातारा : बालमृत्यू, कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला असलातरी सातारा जिल्हा एक पाऊल पुढे आहे. जिल्ह्यातील पन्नासहून अधिक अंगणवाड्यांच्या परिसरात अनेक वर्षांपासून परसबागा आहेत. तेथील भाजीपाल्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होतो.

राज्यात बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण आहे. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असते. त्यामुळे आता लहान मुलांसाठी राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडीच्या आवारात परसबागा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांत रिलायन्सच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर असे दहा हजार मॉडेल राबविण्यात आली आहेत. या करारामधून आता राज्यात २५ हजार अंगणवाड्यांमध्ये परसबाग निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे; पण राज्य शासनाने हा निर्णय आता घेतला असलातरी अनेक अंगणवाड्यात परसबाग तयार केल्या आहेत.

जिल्ह्यात एकात्मिक बालविकास विभागांतर्गत अंगणवाडींचे १८ प्रकल्प कार्यान्वित आहेत. दहिवडी, म्हसवड, सातारा, पाटण, कोरेगाव, फलटण, खटाव, खंडाळा, वाई आदी ठिकाणी ते असून, या केंद्रांतर्गत किमान चार-पाच ठिकाणच्या अंगणवाडीच्या आवारात तरी परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. अनुदान नसतानाही लोकसहभागातून या परसबागा तयार केल्या आहेत. त्यामध्ये वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, हिरव्या पालेभाज्या, फळांची झाडे आहेत.कुपोषणाची समस्या कमी होणार...अंगणवाड्यातील बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषणाची समस्या जाणवते. त्यामुळे परसबागेतील ताजी फळे, भाज्यामधून बालकांना पोषण आहार मिळेल आणि कुपोषणाची समस्या कमी होईल, असा दावाही सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील सुमारे ५० हून अधिक अंगणवाड्यांच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून परसबागा आहेत. त्यामधील पालेभाज्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होत आहे. तसेच फळे विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देण्यात येतात.- जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी