शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चिमुरड्यांना परसबागेतील भाज्या, सातारा जिल्ह्यातील अंगणवाड्या एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:15 IST

नितीन काळेल ।सातारा : बालमृत्यू, कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला असलातरी सातारा जिल्हा एक पाऊल पुढे आहे. जिल्ह्यातील पन्नासहून अधिक अंगणवाड्यांच्या परिसरात अनेक वर्षांपासून परसबागा आहेत. तेथील भाजीपाल्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होतो.राज्यात बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण आहे. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च ...

ठळक मुद्देबालमृत्यू, कुपोषण निर्मूलनासाठी पुढाकार

नितीन काळेल ।सातारा : बालमृत्यू, कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला असलातरी सातारा जिल्हा एक पाऊल पुढे आहे. जिल्ह्यातील पन्नासहून अधिक अंगणवाड्यांच्या परिसरात अनेक वर्षांपासून परसबागा आहेत. तेथील भाजीपाल्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होतो.

राज्यात बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण आहे. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असते. त्यामुळे आता लहान मुलांसाठी राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडीच्या आवारात परसबागा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांत रिलायन्सच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर असे दहा हजार मॉडेल राबविण्यात आली आहेत. या करारामधून आता राज्यात २५ हजार अंगणवाड्यांमध्ये परसबाग निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे; पण राज्य शासनाने हा निर्णय आता घेतला असलातरी अनेक अंगणवाड्यात परसबाग तयार केल्या आहेत.

जिल्ह्यात एकात्मिक बालविकास विभागांतर्गत अंगणवाडींचे १८ प्रकल्प कार्यान्वित आहेत. दहिवडी, म्हसवड, सातारा, पाटण, कोरेगाव, फलटण, खटाव, खंडाळा, वाई आदी ठिकाणी ते असून, या केंद्रांतर्गत किमान चार-पाच ठिकाणच्या अंगणवाडीच्या आवारात तरी परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. अनुदान नसतानाही लोकसहभागातून या परसबागा तयार केल्या आहेत. त्यामध्ये वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, हिरव्या पालेभाज्या, फळांची झाडे आहेत.कुपोषणाची समस्या कमी होणार...अंगणवाड्यातील बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषणाची समस्या जाणवते. त्यामुळे परसबागेतील ताजी फळे, भाज्यामधून बालकांना पोषण आहार मिळेल आणि कुपोषणाची समस्या कमी होईल, असा दावाही सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील सुमारे ५० हून अधिक अंगणवाड्यांच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून परसबागा आहेत. त्यामधील पालेभाज्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी होत आहे. तसेच फळे विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देण्यात येतात.- जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी