शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

भाजी व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर संक्रांत !

By admin | Updated: April 4, 2015 00:02 IST

माल मंडईत घेऊन जागेवरच विक्री : समर्थ भाजी मंडईचा वाद पुन्हा पेटणार ; विक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात

सातारा : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील भाजी मंडईचा वाद पुन्हा नव्याने पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजार समितीच्या समोर दररोज सकाळी भरणाऱ्या मंडईमुळे श्री समर्थ सर्वधर्म महिला मंडळाच्या भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांंच्या नावाखाली अन्य तालुक्यातील व्यापारी मार्केटमधूनच खरेदी करून तिथे भाजी विकत आहेत. बाजार समिती, नगरपालिका, वाहतूक पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. ही मंडई बेकायदेशीर असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा श्री समर्थ सर्वधर्म महिला मंडळातील व्यापाऱ्यांनी दिला आहे.शहरातील पोवई नाक्यावर भरणाऱ्या भाजी मंडईचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळेस कोणती ना कोणती संघटना आंदोलन करते, त्यानंतर त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचा तोडगा काढला जातो; परंतु या वादावर कायमस्वरूपी तोडगा अद्यापही निघाला नाही. काही दिवसांपूर्वी डी. बी. कदम मार्केटच्या समोर रस्त्यावरच मंडई भरत होती. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत होती. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी मंडई भरण्यास मनाई केल्यानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यामुळे राधिका रस्त्यावर मंडई भरू लागली. तरीसुध्दा वाहतूक कोंडीची समस्या सुटली नाही. त्यानंतर पुन्हा मंडई भरण्यास मनाई करण्यात आली. तेव्हा पुन्हा शेतकरी संघटनेने आंदोलन केले. या आंदोलनानंतर बाजार समितीच्या समोरील मोकळ्या जागेत सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांंना होलसेल दरात भाजीविक्री करण्यास परवानगी देण्यात आली. त्यासाठी दहा किलोच्या वर भाजीविक्री करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. त्यासाठी बाजार समितीने मोकळ्या जागेचे सपाटीकरण करून तिथे खडी टाकली. त्यामुळे अनेक शेतकरी तिथे भाजीविक्रीसाठी बसू लागले. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाखाली अन्य तालुक्यातील व्यापारी मार्केट कमिटीतून होलसेलमध्ये भाजी घेऊन या मंडईत भाजीची किरकोळ विक्री करू लागले आहेत. सुरुवातीला येथे २५ ते ३० विक्रेते बसत होते. परंतु आता ही संख्या दोनशेच्या वर गेली आहे. या परिसरात पुन्हा वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली असून, अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नाही. (प्रतिनिधी)