शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

वीर धरणग्रस्तांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

शिरवळ: ‘वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, आगामी काळात लवकर खंडाळा तालुक्यातील वीर ...

शिरवळ: ‘वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, आगामी काळात लवकर खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी राज्य शासनाच्या पातळीवर सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल,’ असे प्रतिपादन विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

शिरवळ येथे वीर धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांची भेट घेतली व निवेदन देऊन चर्चा केली.

यावेळी राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय ऊर्फ बंडू ढमाळ, वीर धरण समिती समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, उपसरपंच महेश चव्हाण, ॲड. नारायण चव्हाण, अंतोबा पाटील, अनंतराव चव्हाण, हरिश्चंद्र लिमण, अनिकेत चौधरी व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

यावेळी वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी इतर प्रकल्पांचे पुनर्वसन खंडाळा तालुक्यात होत असताना तालुक्यातील प्रकल्पांच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन मात्र मंगळवेढा, पंढरपूर अशा दूरच्या, भौगोलिकदॄष्ट्या अडचणीच्या व असुरक्षित तालुक्यात करण्यात येत आहे. गेल्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही पुनर्वसन प्रलंबित आहे व अशा अनेक अडचणी येत खंडाळा तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर हा अन्याय दूर करण्याची ग्वाही रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे. यासंदर्भाने दि. १५ सप्टेंबरनंतर संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या समवेत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहीती समिती समन्वयक डॉ. विजय शिंदे यांनी दिली.

०६शिरवळ

शिरवळ येथे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती सांगताना वीर धरणग्रस्त शेतकरी.

(छाया : मुराद पटेल, शिरवळ)