शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वाठार स्टेशन, आदर्कीचा इतिहास शिवकालीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:14 IST

सातारा : जिल्ह्यातील वाठार स्टेशन आणि आदर्की गावांची माहिती चुकीच्या प्रकारे सोशल मीडियावर फिरत असून, ही गावे ब्रिटिश राजवटीच्या पूर्वीपासून आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळापासून या गावांचे अस्तित्व आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत असलेली पोस्टमध्ये गावच्या इतिहासाची मोडतोड होत आहे. त्याबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.सध्या वाठार स्टेशन ...

सातारा : जिल्ह्यातील वाठार स्टेशन आणि आदर्की गावांची माहिती चुकीच्या प्रकारे सोशल मीडियावर फिरत असून, ही गावे ब्रिटिश राजवटीच्या पूर्वीपासून आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळापासून या गावांचे अस्तित्व आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत असलेली पोस्टमध्ये गावच्या इतिहासाची मोडतोड होत आहे. त्याबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.सध्या वाठार स्टेशन व आदर्की या गावांची चुकीची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. या माहितीनुसार मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील ही गावे रेल्वे मार्गावरील पाणी भरण्याचे ठिकाण होते. ही गावे इंग्रज काळापासून वसली असे सांगितले जात आहे. खरेतर ही माहिती बरोबरच नाही. याबद्दल त्या भागातीलच तडवळेचे माजी सैनिक बजरंग निंबाळकर यांना या पोस्टबद्दल विचारले तर ते म्हणाले, ‘हा खोटा प्रचार आहे. कारण संबंधित गावे ही खूप जुनी व ब्रिटिशांच्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत. ही गावे छत्रपती शिवरायांच्या काळापासून अस्तित्वात आहेत. त्याचे पुरावे दोन्ही गावांत आहेत. त्या भागातील वाडे, विहिरी, मंदिरे साक्षीदार म्हणून अस्तित्वात आहेत. ब्रिटिशांच्या आधीपासूनच वाठार या एकाच नावाची अनेक गावे आहेत.रेल्वे सुरू झाली तेव्हा खरंतर पाणी नीरा येथेच भरलं जात होतं. कारण वाठार या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य होते. वाठार स्टेशन हे नाव वाठार गाव हद्दीतील स्टेशन म्हणून पडले आहे. वाठार हे संमत वाघोलीतील एक गाव होते. छत्रपती शाहूराजे भोसले यांनी या गावची निमपाटीलकी भोईटे घराण्याला दिली होती. मोकासा हक्क हा जहागिरदार,भोईटे, मोहिते, जाधवराव या घराण्यांना वाठार, संमत वाघोलीत होता. सध्या वाठार हे स्टेशनसह बाजारपेठेचे एक गाव आणि ग्रामपंचायत आहे, असेही निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.आदर्की खुर्द हे निंबाळकर घराण्याची पाटीलकी असणारे गाव आहे. येथे छत्रपती शाहू यांच्या काळात १७०७-४९ च्या दरम्यान संताजी निंबाळकर यांचा उल्लेख येतो. येथे मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांचा वाडा होता. हे गाव जुने आहे. आदर्की खुर्द शेजारी हिंगणगाव, तडवळे, आदर्की बुद्रुक ही गावे असून, शंभू महादेव डोंगररांग आहे.आदर्कीजवळ असलेल्या सालपे घाटात निंबाळकर-जाधव यांच्यात लढाई झाल्याची माहिती सांगण्यात येते. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने यामध्ये या लढाईची माहिती आहे. धनाजी जाधव यांच्या मृत्यूनंतर व १७१० च्या पावसाळ्यानंतर बाळाजी विश्वनाथ व चंद्रसेन जाधव यांची नीरेवर लढाई झाली. बाळाजी विश्वनाथ पांडवगडावरून साताºयास छत्रपती शाहूंकडे आले.चंद्रसेन जाधव हे १७११ च्या प्रारंभी कोल्हापुरास जाण्याच्या बेतात होते. इतक्यात छत्रपती शाहू यांच्या आज्ञेवरून हैबतराव निंबाळकर हे चंद्रसेन जाधव यांच्यावर चालून आले. त्या दोघांची लढाई आदर्कीच्या घाटाखाली १७११ च्या मार्च-एप्रिल महिन्यात झाली, असा आदर्कीतील उल्लेख आहे. संमत वाघोली संदर्भात आणखी एक माहिती म्हणजे जवळच असलेल्या कण्हेरखेडचे पाटील असलेले व पुढे प्रसिद्धीस आलेले राणोजी शिंदे यांची एक मुलगी तडवळे संमत वाघोली येथील भोईटे यांना दिली होती.इतिहास वाचून मत बनवावे...भारत हा लाखो गाव, खेड्यांनी बनलेला देश आहे. अनेक गावे वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यांना स्वत:चा इतिहास आहे. मात्र, काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करण्यात धन्यता मानतात. त्या प्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे. यासाठी जो खरा इतिहास आहे. जो इतिहासकारांनी पुराव्यासह लिहिलेला आहे. तो वाचून मगच आपले मत बनवावे असे वाटते. अशी माहिती वाठार स्टेशनचे माजी सरपंच अमोल आवळे यांनी दिली.

टॅग्स :historyइतिहास