शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांच्या पाणीटंचाईवर वरूणराजाची कृपा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला गेल्या पंधरा-वीस दिवसांत वळीव पाऊस, तौक्ते चक्रीवादळाचा पाऊस तसेच मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला. या ...

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला गेल्या पंधरा-वीस दिवसांत वळीव पाऊस, तौक्ते चक्रीवादळाचा पाऊस तसेच मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे महिनाभरात कास तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन साधारण तीन ते साडेतीन फूट पाणी वाढले. चक्रीवादळाच्या तडाख्यात एका बाजूला प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे पाणीसाठ्यात वाढ होऊन दिलासाही मिळाला आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यापैकी कास ही सर्वात जुनी पाणी पुरवठा योजना आहे. पंचवीस फूट पाणी साठवण क्षमता असलेल्या कास तलावातून शहराला दररोज साडेपाच लाख लीटर पाण्याची गरज भासते. उन्हाळा सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणीपातळी खालावते. मागील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीपातळी अगदी नऊ फुटांच्या खाली आली होती. यामुळे सातारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असतानाच वळीव, तौक्ते चक्रीवादळ व मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर होऊन वरुणराजाची सातारकरांवर कृपा झाली अन् पाणीपातळी तीन ते साडेतीन फुटाने झपाट्याने वाढली. सद्यस्थितीत तलावातील पाणीपातळी साडेअकरा फूट एवढी असून, सातारकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

(चौकट)

सततच्या पावसाने जमिनीची धर धरण्यास मदत झाली आहे. तसेच तीव्र ऊन नसल्याने पाण्याचे बाष्पीभवनही होत नाही. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तसेच झरेदेखील फुटल्याने पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होत आहे. सध्या मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. मान्सून काही दिवस लांबणीवर जरी गेला तरी सातारकरांना मान्सून सुरू होईपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावात उपलब्ध आहे.

०९ पेट्री

( छाया -सागर चव्हाण )