शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड गाव दत्तक

By admin | Updated: December 19, 2014 00:23 IST

नितीन बानगुडे-पाटील : गडावर भुयारी मार्ग, दारूगोळा भांडाराची शक्यता व्यक्त

पुसेगाव : ‘सातारच्या महादेव डोंगररांगात वसलेला वर्धनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होता. प्राचीन काळात या किल्ल्यावर असणारे; पण काळाच्या ओघात गडावर जमिनीखाली गेलेले मोठ-मोठे महाल, कक्ष, भुयारी मार्ग, चोरट्या वाटा, अन्नधान्य कोठार व दारूगोळा साठ्याचे भांडार असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या गडाच्या संवर्धन व उत्खननासाठी रात्रीचा दिवस करणार असून, ३५० वर्षांपूर्वीच्या गडावरील इतिहासाच्या पुसत चाललेल्या खुणा पुन्हा जागा करण्यासाठीच वर्धनगड गाव दत्तक घेतले आहे. वर्धनगड हे भविष्यात मोठे पर्यटनस्थळ होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.वर्धनगड, ता. खटाव आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, विठ्ठल सावंत, अर्जुन कुंभार, रहेमान भालदार, पांडुरंग फडतरे, किशोर घोरपडे, संभाजी जाधव, मनीष कदम, संतोष कदम, विकास जाधव, वसंत फडतरे, रमेश कुंभार, तुकाराम चव्हाण, सचिन सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, ‘वर्धनगड येथे दहाव्या शतकात राजा भोज यांनी बांधलेला अभेद्य किल्ला. दुष्काळी पट्ट्यात हा किल्ला असून, हिंंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतल्याची नोंद इतिहासातात आजही सापडते. स्वराज्याचा रखवालदार असणारा हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदी अधिक भक्कम करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तटबंदीत उगवलेली झाडे तोडण्याचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा-पंढरपूर रस्त्यालगत गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)शिव संग्रहालय उभारणार...उत्खननादरम्यान सापडलेला जुना ठेवा व ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. शिवकालीन पाणीपुरवठ्याची साक्ष देणाऱ्या गडावरील पाण्याच्या टाक्या साफ करून गावाच्या नागरिकांना त्या पाण्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. तसेच गाव दत्तक योजनेअंतर्गत या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी शेतीपूरक उद्योगधंदे या गावात सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ता करण्याची विनंती सरपंच अर्जुन मोहिते यांनी केली.