शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड गाव दत्तक

By admin | Updated: December 19, 2014 00:23 IST

नितीन बानगुडे-पाटील : गडावर भुयारी मार्ग, दारूगोळा भांडाराची शक्यता व्यक्त

पुसेगाव : ‘सातारच्या महादेव डोंगररांगात वसलेला वर्धनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होता. प्राचीन काळात या किल्ल्यावर असणारे; पण काळाच्या ओघात गडावर जमिनीखाली गेलेले मोठ-मोठे महाल, कक्ष, भुयारी मार्ग, चोरट्या वाटा, अन्नधान्य कोठार व दारूगोळा साठ्याचे भांडार असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या गडाच्या संवर्धन व उत्खननासाठी रात्रीचा दिवस करणार असून, ३५० वर्षांपूर्वीच्या गडावरील इतिहासाच्या पुसत चाललेल्या खुणा पुन्हा जागा करण्यासाठीच वर्धनगड गाव दत्तक घेतले आहे. वर्धनगड हे भविष्यात मोठे पर्यटनस्थळ होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.वर्धनगड, ता. खटाव आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, विठ्ठल सावंत, अर्जुन कुंभार, रहेमान भालदार, पांडुरंग फडतरे, किशोर घोरपडे, संभाजी जाधव, मनीष कदम, संतोष कदम, विकास जाधव, वसंत फडतरे, रमेश कुंभार, तुकाराम चव्हाण, सचिन सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, ‘वर्धनगड येथे दहाव्या शतकात राजा भोज यांनी बांधलेला अभेद्य किल्ला. दुष्काळी पट्ट्यात हा किल्ला असून, हिंंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतल्याची नोंद इतिहासातात आजही सापडते. स्वराज्याचा रखवालदार असणारा हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदी अधिक भक्कम करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तटबंदीत उगवलेली झाडे तोडण्याचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा-पंढरपूर रस्त्यालगत गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)शिव संग्रहालय उभारणार...उत्खननादरम्यान सापडलेला जुना ठेवा व ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. शिवकालीन पाणीपुरवठ्याची साक्ष देणाऱ्या गडावरील पाण्याच्या टाक्या साफ करून गावाच्या नागरिकांना त्या पाण्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. तसेच गाव दत्तक योजनेअंतर्गत या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी शेतीपूरक उद्योगधंदे या गावात सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ता करण्याची विनंती सरपंच अर्जुन मोहिते यांनी केली.