शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याचा वजन काटा अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात ...

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात आली. या पथकामध्ये सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र आर. एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैधमापनशास्त्र निरीक्षक एस. जी. धोपाटे, क्षेत्रसहायक निरीक्षक व्ही. के. शिंदे कोरेगाव विभाग यांनी केली. त्यावेळी वजन काट्यामध्ये काहीही तफावत नसल्याचे आढळले.

चालू गळीत हंगामातील उत्पादित होणाऱ्या मालाला स्वदेशी तसेच परकीय बाजारपेठामध्ये चांगला भाव मिळत असून, शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर देण्यास कटिबद्ध आहे. गळितास येणाऱ्या उसाचे बिल वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची भूमिका कारखान्याची असल्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी सांगितले. कारखानदारी ही ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर व कर्मचारी या त्रिसूत्रीवर उभी असून, यातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याचे काम वर्धन अ‍ॅग्रोच्या माध्यमातून केले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्याची भूमिका कारखान्याची आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजित डुबल, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, शेती अधिकारी वैभव नलवडे, परचेस ऑफिसर, अश्विन कदम, केनयार्ड सुपरवायझर योगेश कदम, हारूण संदे तसेच ऊस उत्पादक शेतकरी अशोक देशमुख, प्रशांत घाडगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी डुबल यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवण्याचे आवाहन केले.

०३वर्धन कारखाना

फोटो:-वर्धन अ‍ॅग्रो साखर कारखान्याच्या वजन काट्याची पथकाकडून तपासणी करण्यात आली.(छाया-रशिद शेख)