शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याचा वजन काटा अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात ...

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात आली. या पथकामध्ये सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र आर. एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैधमापनशास्त्र निरीक्षक एस. जी. धोपाटे, क्षेत्रसहायक निरीक्षक व्ही. के. शिंदे कोरेगाव विभाग यांनी केली. त्यावेळी वजन काट्यामध्ये काहीही तफावत नसल्याचे आढळले.

चालू गळीत हंगामातील उत्पादित होणाऱ्या मालाला स्वदेशी तसेच परकीय बाजारपेठामध्ये चांगला भाव मिळत असून, शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर देण्यास कटिबद्ध आहे. गळितास येणाऱ्या उसाचे बिल वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची भूमिका कारखान्याची असल्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी सांगितले. कारखानदारी ही ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर व कर्मचारी या त्रिसूत्रीवर उभी असून, यातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याचे काम वर्धन अ‍ॅग्रोच्या माध्यमातून केले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्याची भूमिका कारखान्याची आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजित डुबल, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, शेती अधिकारी वैभव नलवडे, परचेस ऑफिसर, अश्विन कदम, केनयार्ड सुपरवायझर योगेश कदम, हारूण संदे तसेच ऊस उत्पादक शेतकरी अशोक देशमुख, प्रशांत घाडगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी डुबल यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवण्याचे आवाहन केले.

०३वर्धन कारखाना

फोटो:-वर्धन अ‍ॅग्रो साखर कारखान्याच्या वजन काट्याची पथकाकडून तपासणी करण्यात आली.(छाया-रशिद शेख)