शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याचा वजन काटा अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात ...

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात आली. या पथकामध्ये सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र आर. एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैधमापनशास्त्र निरीक्षक एस. जी. धोपाटे, क्षेत्रसहायक निरीक्षक व्ही. के. शिंदे कोरेगाव विभाग यांनी केली. त्यावेळी वजन काट्यामध्ये काहीही तफावत नसल्याचे आढळले.

चालू गळीत हंगामातील उत्पादित होणाऱ्या मालाला स्वदेशी तसेच परकीय बाजारपेठामध्ये चांगला भाव मिळत असून, शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर देण्यास कटिबद्ध आहे. गळितास येणाऱ्या उसाचे बिल वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची भूमिका कारखान्याची असल्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी सांगितले. कारखानदारी ही ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर व कर्मचारी या त्रिसूत्रीवर उभी असून, यातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याचे काम वर्धन अ‍ॅग्रोच्या माध्यमातून केले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्याची भूमिका कारखान्याची आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजित डुबल, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, शेती अधिकारी वैभव नलवडे, परचेस ऑफिसर, अश्विन कदम, केनयार्ड सुपरवायझर योगेश कदम, हारूण संदे तसेच ऊस उत्पादक शेतकरी अशोक देशमुख, प्रशांत घाडगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी डुबल यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवण्याचे आवाहन केले.

०३वर्धन कारखाना

फोटो:-वर्धन अ‍ॅग्रो साखर कारखान्याच्या वजन काट्याची पथकाकडून तपासणी करण्यात आली.(छाया-रशिद शेख)