शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

वॉटर कपमधील विजेत्यांसाठी पुण्यात कौतुक सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 15:15 IST

सातारा : पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. वॉटर कपमधील विजेत्यांना सन्मानित आणि या स्पर्धेतील हिरोंचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह संस्थापक आमीर खान उपस्थित राहणार आहेत.  दरवर्षी ...

ठळक मुद्देकार्यक्रमाला मुख्यमंत्री, आमीर खानही उपस्थित राहणार   ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडी (पुणे) येथे कार्यक्रमयेथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांचा समावेशवॉटर कपमधील विजेत्यांचा सन्मान

सातारा : पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. वॉटर कपमधील विजेत्यांना सन्मानित आणि या स्पर्धेतील हिरोंचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह संस्थापक आमीर खान उपस्थित राहणार आहेत.  

दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक गावांना दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो. गावांना दुष्काळाच्या या मगरमिठीतून सोडविण्याचे व जलसंधारणाच्या मार्गाने गावांना पाणीदार करण्याचे काम पाणी फाउंडेशन मागील दोन वर्षांपासून करत आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते. या विचारातून २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.

या फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकवण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकºयांनी करावा यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. 

पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ म्हणाले, ‘हा समारंभ म्हणजे सामाजिक स्तरातील विविध लोकांचा संगम असेल. शेतकरी, उद्योजक, अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती, शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांचा गौरव करणार आहेत. 

पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांनीही या वॉटर कपनिमित्त गावागावांमध्ये आलेल्या त्यांच्या अनुभवाविषयी सांगितले. गावांमधील लोकांचा, विशेषत: महिलांचा या चळवळीतील सहभाग पाहून मी भारावून गेले आहे. गावांमध्ये असणाºया प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून या चळवळीसाठी योगदान देण्याची त्यांची भावना वाखाणण्याजोगी आहे. १३ जिल्हे ३० तालुके...सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मध्ये सहभागी झालेल्या १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारुर. लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर, अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी, पातूर आणि आकोट, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धारणी या गावांचा समावेश होता.