शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

श्रमदानातून साकारले वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:55 IST

कुडाळ : जावळी तालुक्यात केळघर भागातील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याकरिता शाश्वत स्रोत निर्माण व्हावा. भूजल ...

कुडाळ : जावळी तालुक्यात केळघर भागातील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याकरिता शाश्वत स्रोत निर्माण व्हावा. भूजल पातळीत वाढ होऊन लोकांची पाणी समस्या दूर होण्यास मदत व्हावी या भूमिकेतून जावळीतील कर्मचारी, ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या परिसरात तीन वनराई बंधारे बांधले.

यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनीही येथे श्रमदान केले. पंचायत समिती जावळीकडून दुर्गम, डोंगराळ भागातील जनतेसाठी विविध शासकीय सेवा प्रभावीपणे राबवण्याचे काम गटविकास अधिकारी करत आहेत. केळघर भागातील लोकांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. याकरिता या परिसरातील केळघर, कुरळोशी, पुनवडी याठिकाणी तालुक्यातील ग्रामसेवक, परिसरातील ग्रामस्थ, महिला, शिक्षक यांच्या मदतीने श्रमदानातून ओढ्यावर वनराई बंधारे साकारण्यात आले.

..........................................................

मंडई

वाटाण्याची आवक वाढली

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे त्याचे दरही कमी झाले आहेत. साहजिकच वाटाण्याला मागणीही वाढत आहे. साताऱ्याच्या बाजारात सरासरी तीस ते चाळीस रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.