शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षांसह सभापतींचा बंडाचा झेंडा!

By admin | Updated: January 18, 2016 23:33 IST

जिल्हा परिषदेत राजीनामा नाहीच : मार्चपर्यंत संधी देण्याबाबत पक्षाकडे पत्र

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनंतर इतर पदाधिकारी सोमवारी राजीनामा देणार, असे पक्षाकडून ठामपणे सांगण्यात आले होते. मात्र, आता उपाध्यक्षांसह चौघा सभापतींनीही पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकाविला आहे. राजीनामा तर दिला नाहीच; उलट या पाचजणांनी पक्षाकडे पत्र दिले आहे. त्यामध्ये ३१ मार्चपर्यंत काम करण्याची संधी द्या, अन्यथा पदासह पक्षाचाही राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सबकुछ राष्ट्रवादी अशी परिस्थिती आहे. पाच वर्षांच्या काळातील शेवटच्या अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्गसाठी अध्यक्षपद राखीव झाले. त्यावेळी माण तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार, असे वातावरण होते. पण, विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यावेळी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असणाऱ्या रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात अध्यक्षपद नेले. त्यानंतर पक्षात रुसवे-फुगवे सुरू झाले. आजही ते दिसून येत आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वांनी सांगूूनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशिवाय इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही. गेल्या दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या व्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नाही. तीन दिवसांपूर्वी पक्षाकडून सांगितले की, इतर पदाधिकारी हे सोमवारी राजीनामा देतील; पण सोमवारीही टाळाटाळ झाली. आता तर उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे आणि महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना मोरे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावाने पत्रच दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून काम करताना विधानसभा व ग्रामपंचायत निवडणूक लागली. आचारसंहितेमुळे काम करता आले नाही. विकासात्मक व धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत. आम्हा सर्वांवर अन्याय झाल्याची भावना झाली आहे. त्यामुळे पत्राद्वारे बाजू मांडत आहोत. पक्षाकडून दि. ३१ मार्चपर्यंत काम करण्याची संधी मिळावी. आम्ही ३१ मार्च रोजीचे राजीनामे पत्रासोबत पाठवत आहोत. (प्रतिनिधी)