शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

वाल्मिक@नॉट रिचेबल.कॉम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:25 IST

रवींद्र माने ।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील बहुतेक गावे आजही मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. संबंधित गावे ‘नॉट रिचेबल’ असल्याने शासनाच्या ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ सुविधेचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत गावात आणि दप्तर ढेबेवाडीत अशी अवस्था डोंगरपठारावरील अनेक गावांची झाली आहे.ढेबेवाडी विभागातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत असूनही दाखला, उताऱ्यासाठी येथील ...

रवींद्र माने ।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील बहुतेक गावे आजही मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. संबंधित गावे ‘नॉट रिचेबल’ असल्याने शासनाच्या ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ सुविधेचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत गावात आणि दप्तर ढेबेवाडीत अशी अवस्था डोंगरपठारावरील अनेक गावांची झाली आहे.ढेबेवाडी विभागातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत असूनही दाखला, उताऱ्यासाठी येथील जनतेची किमान वीस किलोमीटरची फरपट होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतींमध्ये संगणक प्रणालीने ग्रामीण महाराष्ट्र जोडण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी ग्रामपंचायतींना संगणकाचे आधुनिक संच दिले. तो हाताळण्यासाठी संगणक तज्ज्ञांची खासगी कंपनीद्वारे नियुक्तीही करण्यात आली. राज्यभर ही यंत्रणा अगदी झपाट्याने पोहोचली खरी; पण त्यासाठी अपेक्षित असलेले मोबाईल नेटवर्क अजूनही ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावर पोहोचले नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.पाणेरी, ताम्हिणे, पांढरेपाणी, कसणी आदी गावांमध्ये ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. त्याठिकाणी शासनाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत लाखो रुपयांचे संगणक संच दिले. मात्र त्या गावांमध्ये कोणत्याही कंपनीचे मोबाईल नेटवर्क नसल्याने ते संगणक संच धूळखात पडले आहेत. एका बाजूला शासन पेपरलेस, झिरो पेंडन्सी तसेच संपूर्ण संगणकीय ग्रामपंचायती असा उपक्रम राबवत असताना या ग्रामपंचायती मात्र दूर असल्याचे चित्र ढेबेवाडी खोºयातील गावागावांमध्ये दिसून येते.कसे करायचे जीपीआर एस टँगिंग?शासनाकडून आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विविध कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अण्णासाहेबांना एक अ‍ॅप देण्यात आले आहे. त्या अ‍ॅपद्वारे ज्या ठिकाणी काम करायचे आहे तेथील फोटो काढून अपलोड करायचा व काम पूर्णत्वानंतर फोटो अपलोड करायचा तरच बील मंजूर होणार, असा नियम असल्याने अशा कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.ढेबेवाडीतून चालतो ग्रामपंचायतीचा कारभारवाल्मिक पठारावरील नेहमीच नॉट रिचेबल असलेल्या काही ग्रामपंचायतीच्या अण्णासाहेबांनी ढेबेवाडी येथे कार्यालय भाडेतत्वावर घेतले असून, तेथूनच संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. यामुळे ग्रामस्थांची मोठी फरफट होते. तसेच नाहक भुर्दंडही बसत आहे.अण्णासाहेबांच्या माथ्यावरकार्यालयाचे भाडे!गावाच्या सोयीसाठी आणि संगणकीय कामकाजासाठी ढेबेवाडी येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या कार्यालयाचे भाड्यासाठी शासनस्तरावर तरतूद नसल्याने त्याचा भुर्दंड अण्णासाहेबांना बसत आहे.