शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

वडूज नगरपंचायत निवडणुकीत धक्कातंत्र!

By admin | Updated: October 19, 2016 23:46 IST

कागदपत्रांसाठी धावपळ सुरू : तिरंगी लढतीची शक्यता; नवखे चेहरेही समोर येऊ लागले

वडूज : खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आणि आचारसंहिता सुरू झाल्याने प्रशासनासह नेतेमंडळींची एकच धावपळ उडाली आहे. ‘आत्ता नाही तर कधीच नाही’ हे ज्ञात असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. कधी नव्हे ते ग्रामपंचायतीकडे फिरकणारे नवखे चेहरेही नगरपंचायतीकडे वळू लागल्याचे पाहून नागरिकांना आश्चर्याचा कळत-न-कळत धक्का बसत आहे. हेच धक्कातंत्र या निवडणुकीत दिसून आले तर त्यात नवल वाटणार नाही. दरम्यान, या निवडणुकीत तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यासह खटाव-माण तालुक्यांचे लक्ष लागून राहिलेली वडूज नगरपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. कारण यापूर्वी गेल्या महिन्यापासून कोणताही कार्यक्रम असो स्थानिक नेत्यांसह तालुक्यातील इतर नेते एकही संधी न सोडता पक्षीय पातळीवर टीका करताना आढळत आहेत. आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा पातळीवरील बैठकीत सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपा यांचे मेळावे एकाच दिवशी झाल्याने तळ्यात-मळ्यात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गोची झालेली आहे. भाजपाच्या मेळाव्याला प्रतिसाद होता तर राष्ट्रवादीच्या मेळाव्याला कमी प्रतिसाद जाणवला. मात्र भाषणबाजीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वबळावरची भाषा केली असली तरी या दोघांचा पक्षीय शत्रू मात्र काँग्रेसच आहे. असे असताना अजूनही शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यातच राहिल्याने वडूज नगरपंचायत निडणुकीला पाहिजे तसा रंग भरलेला नाही. त्यात रासप पक्षाची पावले नेमकी कोणीकडे चालली आहेत हे स्पष्ट न झाल्याने महायुती की युती विना? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी वडूजमध्ये येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. याचा पक्षाला निश्चित फायदा होईलच. मात्र, ही निवडणूक अटीतटीची असल्यामुळे विजयाकडे घोडदौड करणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचे निकष लावले जातील असा प्रारंभी अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु राजकीय डावपेचात माहीर असलेले आ. गोरे यांच्या व्यूहरचनेकडे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. उलट-सुलट चर्चांमुळे वडूजमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, अचानक नगरपंचायतीच्या तारखा जाहीर झाल्याने ही निवडणूक क्रिकेटच्या टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी सामन्यासारखी होईल यात तिळमात्र शंका नाही. खटाव तालुक्याचे विधानसभा मतदार संघात त्रिभाजन झाले असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या तालुकाधर्तीवरच होणार असल्याने पक्षीय पातळीवर वरिष्ठांकडून इतर निवडणुकाबाबत मौन धरले जात आहे. आजपर्यंत वडूज ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहित होत होती. परंतु पहिल्यादांच होणाऱ्या नगरपंचायतीला सर्वच पक्षांनी मोट बांधली आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षीय होणार की पक्षविरहित याकडे सर्वच राजकीय जाणकरांसह वडूजकरांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्याबाहेरील नेत्यांना आपले राजकीय अस्तिव टिकविण्यासाठी स्थानिक नेत्यांना हाताशी धरूनच नगरपंचायतील व्यूहरचना आखणे क्रमप्राप्त असले तरी स्थानिक नेता डोईजड होऊ नये याचीही काळजी प्रामुख्याने घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महायुती अशी निवडणूक झाली तर या तिरंगी निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस यांच्या सभाने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नगरपंचायत आपल्याच ताब्यात असावी या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)वाढत्या संख्येने नेतेमंडळींना डोकेदुखी...इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या पाहता नेतेमंडळींची डोकेदुखी ठरू लागली आहे. असे असले तरी ‘तुम्ही इकडून उमेदवारी देत नाही, तर तिकडून आपल्या नावाची चर्चा आहे,’ असा गर्भित इशाराही देण्यास हे इच्छुक उमेदवार मागे पुढे पाहत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत मौन बाळगणे हेच उचित समजून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसह स्थानिक नेतेही वेळ मारून नेत आहेत.