शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साताऱ्यात लसीचा साठा थोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:49 IST

अन् लसीकरणाला बसतोय खोडा लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सुरुवातीला लसीकरणाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कोरोनाची भीषणता ...

अन् लसीकरणाला बसतोय खोडा

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात सुरुवातीला लसीकरणाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कोरोनाची भीषणता लक्षात आल्यानंतर लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होऊ लागली. मात्र लसीचा वारंवार तुटवडा होत असल्याने लसीकरणाला खोडा बसत आहे. गत पाच महिन्यांत सातारा शहरात केवळ ६९ हजार ७३५ जणांनी लसीकरण केले आहे. म्हणजे ३२ टक्केच लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात २३ जानेवारीला लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. या वेळी नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. लसीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आणि गैरसमजही होते. त्यामुळे सुरुवातीला दिवसाला दोनशे ते तीनशे लसीकरण होत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर नागरिक हादरून गेले. लसीकरणशिवाय पर्याय नाही, हे नागरिकांना कळून चुकले. तेव्हा लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होउ लागली. सातारा शहरामध्ये केवळ तीन लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये पहिल्या दिवसापासून गर्दी होत आहे. पहाटे चार वाजता अनेकजण लसीकरण केंद्रावर येऊन रांगा लावत होते. भर उन्हातही लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत होता. मात्र, लसीचा वारंवार तुटवडा होत असल्यामुळे अनेकदा नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. सध्याही हीच परिस्थिती आहे. शहरातील शेवटच्या टोकावर राहणारे नागरिकही लसीसाठी धडपड करत आहेत. कितीही दूरवरील केंद्रावर जातो, पण लस द्या, अशी मागणी होत आहे.

लसीकरण कमी होण्याची कारणे

वारंवार होणारा लसीचा तुटवडा हे लसीकरण कमी होण्याचे मुख्य कारण आहे. शहराची लोकसंख्या २ लाख २५ हजार इतकी आहे. असे असताना लसीकरणाचा वेग जर वाढला नाही तर अजून एक वर्ष लस घेण्यासाठी या सर्वांना लागतील. लसीकरणाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वारंवार लसीचा तुटवडा होत असल्यामुळे लसीकरणाला अडथळा निर्माण होत आहे. शासनाकडून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविता येईल.

अभिजित बापट- मुख्याधिकारी, सातारा पालिका

मोफत लसीकरणावर अनेकांचा भर...

सातारा शहरात तीन लसीकरण केंद्रे असून, या केंद्रांवर मोफत लसीकरण केले जाते. त्यामुळे अनेकांचा मोफत लस घेण्याकडेच ओढा आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय, गाडोली आणि कस्तुरबा रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. या तिन्ही केंद्रांवर ६९ हजार ७३५ इतके लसीकरण झाले आहे.

सर्वाधिक लसीकरण सिव्हिलमध्ये झाले असून, ३१ हजार ४८ इतके आहे. तर कस्तुरबामध्ये १३ हजार ८८९ इतके झाले आहे.

साताऱ्यातील गाडोली केंद्रावर १४ हजार ७९८ जणांनी लसीकरण केले आहे. मात्र, लसीचा तुटवडा होत असल्याने लसीकरणाला वारंवार व्यत्यय येतोय.