शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोशल मीडिया जपून वापरा

By admin | Updated: July 23, 2014 22:31 IST

शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन : भावना भडकावून सामाजिक शांतता बिघडवू नका

सातारा : महिती तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉटस अप, फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाचा वापर सर्रास केला जात आहे. मात्र अशा मीडियावर धार्मिक भावना भडकावण्याचे, सामाजिक शांतता बिघडवण्याचे प्रकारही सातत्याने घडत असल्याने तो चिंंतेचा विषय बनला आहे. सातारा शहराला शांतता आणि सामाजिक बंधुत्वाची मोठी परंपरा आहे. सातारकरांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा आणि शहराची ही ओळख जपावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या प्रत्येकाच्या हातात आधुनिक मोबाइल असून, व्हॉटस अप, फेसबुकसारख्या सोशल मीडियात प्रत्येकजण मग्न झाला आहे. मात्र काही समाजकंटकङ्कआक्षेपार्ह मजकूर या मीडियावर टाकून तेढ निर्माण करतात. त्यामुळे सामाजिक शांततेला बाधा पोहोचते.सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मजकूर टाकल्याने शांतता बिघडून अनुचित प्रकार घडतात, हे आपण काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. मुळात असे घडू नये यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. सामाजिक शांतता ही प्रशासनाची जबाबदारी आहे, तशीच ती आपलीही आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवावी.सध्या सणासुदीचे दिवस असून राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत भावना भडकावून समाजात अनुचित प्रकार घडेल, या उद्देशाने समाजकंटक असे प्रकार करतात, हे सर्वांना ज्ञात असणे गरजेचे आहे.असे मजकूर आणि छायाचित्रे प्रसिध्द झाल्यास सुज्ञ नागरिक आणि युुवकांनी त्याला महत्त्व न देता, अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तरच सामाजिक शांतता आणि जातीय सलोखा अबाधित राहील, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)