शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

भ्रष्टाचारासाठीच सत्तेचा वापर

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

पंकजा मुंडे : फलटण येथे संघर्ष यात्रेत ‘आघाडी’वर हल्लाबोल

फलटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेली पंधरा वर्षे सत्ता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच वापरली आहे. त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. याच काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, राज्याला अधोगतीला नेणाऱ्या दोन्ही काँगे्रसची सत्ता विधानसभा निवडणुकीत उलथवून टाका,’ असे आवाहन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे आज, रविवारी येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश भाजपच्या सरचिटणीस कांताताई नलवडे, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष बजरंग गावडे, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, नगरसेवक अनुप शहा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दशरथ चांगण, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, बजरंग खटके, विराज खराडे, दादासाहेब चोरमले, डॉ. वि. रा. त्रिपुटे, उत्तमराव भोसले उपस्थित होते.आ. मुंडे-पालवे म्हणाल्या, ‘वीस वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी संघर्षयात्रा काढून काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले होते. आता त्यांचा वारसा मी गोरगरिबांच्या आशीर्वादावर जपत संघर्षयात्रा काढली आहे. काँग्रेस आघाडीने भ्रष्टाचार, अत्याचार व मनमानी कारभार चालविला आहे. त्याचा भांडाफोड या माध्यमातून करून जनतेत जनजागृती करण्याचा आपला प्रयत्न आहे.’‘धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. त्यांचे अखेरचे भाषणही चौंडी येथे झाले होते. माझ्या संघर्ष यात्रेची सांगताही चौंडी येथेच होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. सामान्य माणसेच क्रांती घडवतात. गोपीनाथ मुंडेंनी क्रांती घडविली. महादेव जानकर यांनी बारामतीकरांच्या तोंडाला फेस आणला. सदाभाऊ खोत यांनी साखरसम्राटांना जेरीस आणले, तर नरेंद्र मोदींसारखा सामान्य माणूस पंतप्रधानपदी बसतो, हे येथील सर्वसामान्य जनताच करू शकते,’ असेही मुंडे-पालवे म्हणाल्या. यावेळी सदाभाऊ खोत यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)