शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारासाठीच सत्तेचा वापर

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

पंकजा मुंडे : फलटण येथे संघर्ष यात्रेत ‘आघाडी’वर हल्लाबोल

फलटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेली पंधरा वर्षे सत्ता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच वापरली आहे. त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. याच काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, राज्याला अधोगतीला नेणाऱ्या दोन्ही काँगे्रसची सत्ता विधानसभा निवडणुकीत उलथवून टाका,’ असे आवाहन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे आज, रविवारी येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश भाजपच्या सरचिटणीस कांताताई नलवडे, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष बजरंग गावडे, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, नगरसेवक अनुप शहा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दशरथ चांगण, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, बजरंग खटके, विराज खराडे, दादासाहेब चोरमले, डॉ. वि. रा. त्रिपुटे, उत्तमराव भोसले उपस्थित होते.आ. मुंडे-पालवे म्हणाल्या, ‘वीस वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी संघर्षयात्रा काढून काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले होते. आता त्यांचा वारसा मी गोरगरिबांच्या आशीर्वादावर जपत संघर्षयात्रा काढली आहे. काँग्रेस आघाडीने भ्रष्टाचार, अत्याचार व मनमानी कारभार चालविला आहे. त्याचा भांडाफोड या माध्यमातून करून जनतेत जनजागृती करण्याचा आपला प्रयत्न आहे.’‘धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. त्यांचे अखेरचे भाषणही चौंडी येथे झाले होते. माझ्या संघर्ष यात्रेची सांगताही चौंडी येथेच होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. सामान्य माणसेच क्रांती घडवतात. गोपीनाथ मुंडेंनी क्रांती घडविली. महादेव जानकर यांनी बारामतीकरांच्या तोंडाला फेस आणला. सदाभाऊ खोत यांनी साखरसम्राटांना जेरीस आणले, तर नरेंद्र मोदींसारखा सामान्य माणूस पंतप्रधानपदी बसतो, हे येथील सर्वसामान्य जनताच करू शकते,’ असेही मुंडे-पालवे म्हणाल्या. यावेळी सदाभाऊ खोत यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)