शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

भ्रष्टाचारासाठीच सत्तेचा वापर

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

पंकजा मुंडे : फलटण येथे संघर्ष यात्रेत ‘आघाडी’वर हल्लाबोल

फलटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेली पंधरा वर्षे सत्ता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच वापरली आहे. त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. याच काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, राज्याला अधोगतीला नेणाऱ्या दोन्ही काँगे्रसची सत्ता विधानसभा निवडणुकीत उलथवून टाका,’ असे आवाहन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे आज, रविवारी येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश भाजपच्या सरचिटणीस कांताताई नलवडे, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष बजरंग गावडे, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, नगरसेवक अनुप शहा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दशरथ चांगण, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, बजरंग खटके, विराज खराडे, दादासाहेब चोरमले, डॉ. वि. रा. त्रिपुटे, उत्तमराव भोसले उपस्थित होते.आ. मुंडे-पालवे म्हणाल्या, ‘वीस वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी संघर्षयात्रा काढून काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले होते. आता त्यांचा वारसा मी गोरगरिबांच्या आशीर्वादावर जपत संघर्षयात्रा काढली आहे. काँग्रेस आघाडीने भ्रष्टाचार, अत्याचार व मनमानी कारभार चालविला आहे. त्याचा भांडाफोड या माध्यमातून करून जनतेत जनजागृती करण्याचा आपला प्रयत्न आहे.’‘धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. त्यांचे अखेरचे भाषणही चौंडी येथे झाले होते. माझ्या संघर्ष यात्रेची सांगताही चौंडी येथेच होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. सामान्य माणसेच क्रांती घडवतात. गोपीनाथ मुंडेंनी क्रांती घडविली. महादेव जानकर यांनी बारामतीकरांच्या तोंडाला फेस आणला. सदाभाऊ खोत यांनी साखरसम्राटांना जेरीस आणले, तर नरेंद्र मोदींसारखा सामान्य माणूस पंतप्रधानपदी बसतो, हे येथील सर्वसामान्य जनताच करू शकते,’ असेही मुंडे-पालवे म्हणाल्या. यावेळी सदाभाऊ खोत यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)