शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराचा वापर राजकारणासाठी

By admin | Updated: April 13, 2016 23:39 IST

जयकुमार गोरे : अधिवेशनात केली २५ मिनिटे तुफान बॅटिंग--सातारा जिल्हा बँक

सातारा : सातारा जिल्हा बँकेत संचालक मंडळ, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार तसेच डीडीआर, संचालक, कार्यकारी समितीच्या अधिकारावरून आमदार जयकुमार गोरे यांनी अधिवेशनात पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले. सवलतीच्या दरातील कर्ज वाटप, कर्ज प्रकरणे संचालक मंडळासमोर न येणे व अनेक मुद्द्यांवरून त्यांनी २५ मिनिटे तुफान बॅटिंग करून सरकार तसेच सहकारमंत्र्याकडून स्पष्टीकरण मागीतले.अधिवेशनात आ. गोरे म्हणाले, ‘राज्यात ज्या भागात सहकार मोडकळीस आला त्या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या केल्या आहेत. जिल्हा बँका बुडाल्या म्हणून त्या भागातील शेतकरी सावकारी कर्जाच्या खाईत लोटला गेला. हे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. आमच्याकडे आता सहकाराचा वापर राजकारणासाठी होऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या बँकेतच शेतकरी वेठीस धरला जात आहे. कोणतीही सहकारी संस्था लगेच बुडत नाही.संस्था मोडकळीस येण्याची प्रक्रिया पाच, दहा वर्षे चालते. संस्थेतील मंडळी सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार सोडून राजकारण करतात तेव्हा संस्था अडचणीत येते. बँक बुडण्याची कीड हळूहळू पसरते. आणि बँकाच खाऊन टाकते. अनेक जिल्हा बँकांमध्ये आज अशी परिस्थिती आहे. राज्य सहकारी बँकेला अनेक पुरस्कार मिळाले होते. आमच्या जिल्हा बँकेलाही मिळाले आहेत. मात्र, राज्य सहकारी बँक बुडाली आहे. राज्यात आणखी आठ ते दहा बँका बुडाल्या आहेत. त्या बँकामध्ये डीडीआर नव्हते का? त्यांनी या बँकांमध्ये चुकीचे कामकाज चालत असल्याचे का सांगितले नाही? माझ्या उपोषणानंतर जिल्हा बँकेत झालेल्या तीन मीटिंगला डीडीआर उपस्थित नव्हते.खरे तर डीडीआर ने बँकेच्या कारभाराविषयी मत मांडले पाहिजे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे ते कामच असले पाहिजे. बँका बुडाल्या की सरकार ठेवीदारांना मदत करते. आम्हीही तशी मागणी करतो; मात्र शासनाच्या प्रतिनिधीने चुकीच्या कारभाराची माहिती दिली तर अशी वेळच येणार नाही. एखादी बँक बुडाली तर संपूर्ण संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात येते; परंतु सातारा जिल्हा बँकेत गेल्या आठ महिन्यांत एकही कर्ज प्रकरण संचालक मंडळासमोर आले नाही. ते अधिकार प्रचलित पद्धतीनुसार कार्यकारी समितीला असल्याचे सांगितले जाते.तीन वर्षे दुष्काळामुळे पीकच नाही तर पाहणार काय? बँकेच्या या फतव्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. नाबार्डच्या परिपत्रकात अंतिम पाहणी करावी, असे सांगितले आहे. कर्जाचा वापर झाला आहे किंवा कसे याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विनाकारण अडविले जात आहे. अशा वेळी शासनाच्या वतीने काम करणारा संचालक कुठे जातो.शासनाने सुतगिरण्यांना भागभांडवल दिले आहे. नवीन अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद केली आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सोडल्या तर कोणत्याच सूतगिरण्यांणी भागभांडवर परत केले नाही. किती सहकारी सूतगिरण्या सुरू आहेत. याप्रकरणी संचलाक मंडळावरील प्रतिनिधी नक्की काय करतो? या चुकीच्या गोष्टी तो शासनाला का सांगत नाही? खरी माहिती कागदावर येणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)