शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मान्याचीवाडी ग्रामसभेसाठी बायोमेट्रिक चा वापर : राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:53 IST

सातत्यपूर्ण उपक्रमातून राज्यातच नव्हे तर देशामध्ये आपला वेगळा ठसा उमटविलेल्या मान्याचीवाडी गावाने आज आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामसभा घेणारी मान्याचीवाडी आता राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

ठळक मुद्देनावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्रामस्थांचे आणखी एक पाऊल पुढे

 कऱ्हाड : सातत्यपूर्ण उपक्रमातून राज्यातच नव्हे तर देशामध्ये आपला वेगळा ठसा उमटविलेल्या मान्याचीवाडी गावाने आज आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामसभा घेणारी मान्याचीवाडी आता राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.राज्यातील दुर्गम तालुका म्हणून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याची ओळख आहे आणि या पाटण तालुक्याच्या एका कोपºयात मान्याचीवाडी ही सव्वाचारशे लोकसंख्या असलेलं गाव वसलेलं आहे. २००१ मध्ये याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेत या गावाने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावयाला सुरुवात केली तो आजपावतो फडकवतच ठेवला आहे.

मंगळवार, दि. २१ रोजी सकाळी साडेदहा वाजता मान्याचीवाडी ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थांनी गर्दी करायला सुरुवात केली. प्रवेशद्वारावर असणाºय बायोमेट्रिक मशीनवर ग्रामस्थांनी आपल्या अंगठ्याचे ठसे दिले आणि सभागृहात प्रवेश केला. बघता बघता सभागृह भरून गेले. सरपंच रवींद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. ग्रामसेवक प्रसाद यादव यांनी विषयांचे वाचन केलेव्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवादमान्याचीवाडी ग्रामसभेने बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करीत ग्रामसभा घेण्याचा राज्यातला पहिला मान पटकाविला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मान्याचीवाडी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी डॉ. शिंदे यांनी हा उपक्रम राज्याला आदर्शवत ठरेल तसेच यामुळे ग्रामसभा पारदर्शक होतील व ग्रामसभेच्या माध्यमातून निर्माण होणारे वाद थांबतील, अशी आशा व्यक्त केली.ग्रामसभेत झालेले महत्त्वाचे ठरावआजपर्यंत सातबारावर फक्त पतीचेच नाव लिहिले गेले आहे. मात्र, या ठिकाणी पतीबरोबर पत्नीचेही नाव यावे, याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.मुलींचा जन्मदर घटत आहे, ही गंभीर बाब ओळखून यापुढे गावातील कोणीही गर्भलिंगनिदान चाचणी करावयाची नाही, असा ठरावही एकमताने घेण्यात आला.ग्रामीण भागातील महिला आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष व्हाव्यात, यासाठी अस्मिता योजना प्रभावीपणे राबविणे. 

ग्रामसभा बळकट झाल्या तर निश्चितच गावाचा कायापालट होतो, हे आमच्या ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. यासाठी ग्रामसभांना उपस्थिती महत्त्वाची असून, ग्रामसभेचा सदस्यच या सभांना उपस्थित असला पाहिजे. यासाठी बायोमेट्रिक पद्धती गरजेची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये या पद्धतीचा वापर केल्यास पारदर्शक ग्रामसभा होतील आणि चुकीच्या पद्धतीने उधळणाºया जाणाºया ग्रामसभांना यामुळे नक्कीच सुसूत्रता येईल. या उपक्रमांसाठी अधिकारी तसेच मार्गदर्शक उत्तमराव माने यांचे सहकार्य लाभले आहे.- रवींद्र माने सरपंच, ग्रामपंचायत मान्याचीवाडी, ता. पाटण