शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

फलटणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सुगंधी शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:05 IST

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार ...

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार यांनी पाच गुंठे क्षेत्रात मोगºयाचा सुगंध फुलवत आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.लहानपणापासून शेतीची आवड असणारे सुरेंद्र हे हार बनविण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असतानाच मोगºयाच्या फुलांची शेती करण्याची कल्पना त्यांना सुचली. हार, गजरे तयार करताना मोगºयाच्या फुलांचा तुटवडा त्यांना जाणवू लागला. त्यातूनच त्यांनी त्यांच्याकडे असणाºया पाच गुंठे क्षेत्रात बारामती येथून आणलेली मोगºयाची रोपे लावली आणि गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे या प्रयोगातून त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण झाले.सुरेंद्र यांच्या शेतात आज शंभर झाडे आहेत, त्याचे त्यांनी व्यवस्थित हंगामवार नियोजन केले आहे. मार्च ते सप्टेंबर या महिन्यांत महाराष्ट्रीयन एक पाकळी मोगरा त्यांनी लावला आहे तर सप्टेंबर ते मार्च यासाठी बेंगलोरचा कांगडा त्यांनी लावला आहे. कमी क्षेत्र असणाºया शेतकºयांसाठी फुलशेती निश्चितच फायद्याची ठरत आहे.सुरेंद्र यांचे सर्वच कुटुंबीय सकाळी लवकर कळ्या तोडायला सुरुवात करतात. या कामात त्यांची पत्नी अश्विनी, आई सरस्वती, वडील दत्तात्रय व मुलगा धनराज त्यांना मदत करतात. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत सर्व फुलकळी तोडून नंतर फलटण येथील हार विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जातो.मोगºयाला ग्रामीण भागात किलोला दोनशे ते अडीचशे रुपये हमखास मिळतात. लग्न तिथीच्या दिवशी तीनशे ते चारशेपर्यंत हा दर जातो. शहरात मोगºयाला किलोमागे पाचशे ते सहाशे रुपये दर मिळतो. त्यामुळे कमी क्षेत्र आहे म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. उलट क्षेत्र कमी असल्यामुळे आपण तिच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.झाडांना समजूनघेणं आवश्यक..प्रत्येक शेतकºयाने प्रयोगशील असले पाहिजे. शेतीत माती आणि पाणी हे एक प्रकारचे गणित आहे. झाडांना काय पाहिजे आणि काय नको, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण माणसांना, जनावरांना समजून घेतो तसेच झाडांना शेतीला घेतलं तर आपणास कधीच नुकसान होणार नाही, असे ही सुरेंद्र पवार सांगतात.