शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

फलटणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सुगंधी शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:05 IST

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार ...

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार यांनी पाच गुंठे क्षेत्रात मोगºयाचा सुगंध फुलवत आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.लहानपणापासून शेतीची आवड असणारे सुरेंद्र हे हार बनविण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असतानाच मोगºयाच्या फुलांची शेती करण्याची कल्पना त्यांना सुचली. हार, गजरे तयार करताना मोगºयाच्या फुलांचा तुटवडा त्यांना जाणवू लागला. त्यातूनच त्यांनी त्यांच्याकडे असणाºया पाच गुंठे क्षेत्रात बारामती येथून आणलेली मोगºयाची रोपे लावली आणि गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे या प्रयोगातून त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण झाले.सुरेंद्र यांच्या शेतात आज शंभर झाडे आहेत, त्याचे त्यांनी व्यवस्थित हंगामवार नियोजन केले आहे. मार्च ते सप्टेंबर या महिन्यांत महाराष्ट्रीयन एक पाकळी मोगरा त्यांनी लावला आहे तर सप्टेंबर ते मार्च यासाठी बेंगलोरचा कांगडा त्यांनी लावला आहे. कमी क्षेत्र असणाºया शेतकºयांसाठी फुलशेती निश्चितच फायद्याची ठरत आहे.सुरेंद्र यांचे सर्वच कुटुंबीय सकाळी लवकर कळ्या तोडायला सुरुवात करतात. या कामात त्यांची पत्नी अश्विनी, आई सरस्वती, वडील दत्तात्रय व मुलगा धनराज त्यांना मदत करतात. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत सर्व फुलकळी तोडून नंतर फलटण येथील हार विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जातो.मोगºयाला ग्रामीण भागात किलोला दोनशे ते अडीचशे रुपये हमखास मिळतात. लग्न तिथीच्या दिवशी तीनशे ते चारशेपर्यंत हा दर जातो. शहरात मोगºयाला किलोमागे पाचशे ते सहाशे रुपये दर मिळतो. त्यामुळे कमी क्षेत्र आहे म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. उलट क्षेत्र कमी असल्यामुळे आपण तिच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.झाडांना समजूनघेणं आवश्यक..प्रत्येक शेतकºयाने प्रयोगशील असले पाहिजे. शेतीत माती आणि पाणी हे एक प्रकारचे गणित आहे. झाडांना काय पाहिजे आणि काय नको, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण माणसांना, जनावरांना समजून घेतो तसेच झाडांना शेतीला घेतलं तर आपणास कधीच नुकसान होणार नाही, असे ही सुरेंद्र पवार सांगतात.