शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

फलटणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सुगंधी शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:05 IST

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार ...

विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार यांनी पाच गुंठे क्षेत्रात मोगºयाचा सुगंध फुलवत आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.लहानपणापासून शेतीची आवड असणारे सुरेंद्र हे हार बनविण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असतानाच मोगºयाच्या फुलांची शेती करण्याची कल्पना त्यांना सुचली. हार, गजरे तयार करताना मोगºयाच्या फुलांचा तुटवडा त्यांना जाणवू लागला. त्यातूनच त्यांनी त्यांच्याकडे असणाºया पाच गुंठे क्षेत्रात बारामती येथून आणलेली मोगºयाची रोपे लावली आणि गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे या प्रयोगातून त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण झाले.सुरेंद्र यांच्या शेतात आज शंभर झाडे आहेत, त्याचे त्यांनी व्यवस्थित हंगामवार नियोजन केले आहे. मार्च ते सप्टेंबर या महिन्यांत महाराष्ट्रीयन एक पाकळी मोगरा त्यांनी लावला आहे तर सप्टेंबर ते मार्च यासाठी बेंगलोरचा कांगडा त्यांनी लावला आहे. कमी क्षेत्र असणाºया शेतकºयांसाठी फुलशेती निश्चितच फायद्याची ठरत आहे.सुरेंद्र यांचे सर्वच कुटुंबीय सकाळी लवकर कळ्या तोडायला सुरुवात करतात. या कामात त्यांची पत्नी अश्विनी, आई सरस्वती, वडील दत्तात्रय व मुलगा धनराज त्यांना मदत करतात. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत सर्व फुलकळी तोडून नंतर फलटण येथील हार विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जातो.मोगºयाला ग्रामीण भागात किलोला दोनशे ते अडीचशे रुपये हमखास मिळतात. लग्न तिथीच्या दिवशी तीनशे ते चारशेपर्यंत हा दर जातो. शहरात मोगºयाला किलोमागे पाचशे ते सहाशे रुपये दर मिळतो. त्यामुळे कमी क्षेत्र आहे म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. उलट क्षेत्र कमी असल्यामुळे आपण तिच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.झाडांना समजूनघेणं आवश्यक..प्रत्येक शेतकºयाने प्रयोगशील असले पाहिजे. शेतीत माती आणि पाणी हे एक प्रकारचे गणित आहे. झाडांना काय पाहिजे आणि काय नको, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण माणसांना, जनावरांना समजून घेतो तसेच झाडांना शेतीला घेतलं तर आपणास कधीच नुकसान होणार नाही, असे ही सुरेंद्र पवार सांगतात.