शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उरमोडीचं पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत

By admin | Updated: September 20, 2016 00:07 IST

जयकुमार गोरेंच्या हस्ते पूजन : वरकुटे मलवडी, मार्डी परिसरातील पाणी प्रश्नासाठी आता शासनाविरोधात लढण्याची भूमिका

म्हसवड : ‘उरमोडीचे पाणी मते आणि राजकारणासाठी आणलं नाही. आजचा दिवस हा माझ्यासाठी, माणगंगेसाठी आणि सिद्धनाथ नगरीसाठी ऐतिहासिक आहे. उरमोडीचे पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत आणलं, आता लढाई जिहे-कटापूर, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावे व मार्डी परिसरातील १४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी आहे. शासनाला जाग आणण्यासाठी यापुढील काळात आंदोलन करावे लागेल तरी मागे हटणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.म्हसवड, ता. माण येथे माणगंगा नदीत उरमोडी पाण्याच्या पूजन कार्यक्रमानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती अक्काताई मासाळ, उपसभापती अतुल जाधव, म्हसवडचे नगराध्यक्ष रवींद्र वीरकर, उपनगराध्यक्ष रूपाली कोले, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, सोनिया गोरे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, विजय धट, प्रतिभा लोखंडे, वैशाली लोखंडे, मार्केट कमिटीचे सभापती अरुण गोरे, भीमराव पाटील, दिगंबर आगवणे, किरण बर्गे, दादासाहेब काळे, बाळासाहेब माने, विशाल बागल, सोमनाथ भोसले, संजय जगताप, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, शंकर वीरकर, डॉ. वसंत मासाळ, मारुती वीरकर, अकिल काझी, बाळासाहेब पिसे, लुनेश वीरकर आदी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘आजवर निवडणुका आल्या की तोच जाहीरनामा असायचा. त्यामध्ये माण-खटावच्या पाणीप्रश्न व सर्वांगीण विकास हे दोन कायम वाक्ये; पण मी पहिली निवडणूक लढवताना माणच्या मातीला पाणी देणार व सर्वांगीण विकास करणार ही आश्वासने दिली. ती पूर्णत्वास जात असल्याने मला याचा अभिमान आहे. यासाठी अनेक अडचणींवर मात करत अखेर उरमोडीचे पाणी माणच्या मातीत आणण्यात यशस्वी झालो. तरी या पुढील लढाई जिहे-कटापूर योजनेसाठीची आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी २५० कोटींचा निधी मिळवण्यासाठी, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावांचा व मार्डी परिसरातील १४ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. यासाठी मला तुमच्या साथीची व पाठबळाची गरज आहे. दुष्काळी जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी लढलो. उरमोडीचे आलेले पाणी जपून वापरा, पावसाचे पडणारे पाणी आडवण्याची साधने निर्माण केली. जलयुक्त शिवार योजनेची प्रथम माणमध्ये आम्ही सुरुवात केली. ही योजना नंतर राज्याने स्वीकारली. साखळी बंधाऱ्यांचा पायलट प्रोजेक्ट, कोल्हापूर टाईप बंधारे या सर्व संकल्पना माण-खटावच्या मातीत पहिल्यांदा माझ्या प्रयत्नातून व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठबळाने सुरू करण्यात यशस्वी झालो. नंतर यासर्व संकल्पना राज्याने स्वीकारल्या. याचा अभिमान आहे.’चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘मी जेव्हा पहिल्यांदा म्हसवडमध्ये आले तेव्हा येथील जनतेच्या पाणीप्रश्नासाठी आंदोलन करण्यासाठी आले. या आंदोलनानंतर अटकही झाली. परंतु पाणीप्रश्नासाठी या भागात आले व नंतर मी येथीलच झाले. दुष्काळी जनतेची दु:खे मी पाहिली असून, आपल्याला पाणीदार आमदार मिळाल्याने या भागात पाणी आले आहे. येथील ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात नगरप्रदक्षिणा, गावप्रदक्षिणेसाठी हजारो भक्तगण जात असतात. तसेच आजवर कोरड्या नदीत येथील सुवासिनी दीपोत्सव साजरा करत. परंतु आता ते दिवस संपले असून, यापुढील काळात नदीतील पाण्यातच दीपोत्सव साजरा होणार आहे. हे आ. गोरे भाऊंमुळे शक्य होणार आहे.’ (प्रतिनिधी) चांगल्या कामावर टिवटिव नको... बंधारा कोणी आणला, पाणी कोणी आणले यासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. हे सर्व कोणी आणले हे माझ्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी आपली टीव टीव बंद करावी. चांगले करता येत नसेल तर किमान झालेल्या समाजोपयोगी कामांवर तक्रारी तर करू नये, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.