शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीचं पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत

By admin | Updated: September 20, 2016 00:07 IST

जयकुमार गोरेंच्या हस्ते पूजन : वरकुटे मलवडी, मार्डी परिसरातील पाणी प्रश्नासाठी आता शासनाविरोधात लढण्याची भूमिका

म्हसवड : ‘उरमोडीचे पाणी मते आणि राजकारणासाठी आणलं नाही. आजचा दिवस हा माझ्यासाठी, माणगंगेसाठी आणि सिद्धनाथ नगरीसाठी ऐतिहासिक आहे. उरमोडीचे पाणी माणच्या शेवटच्या टोकापर्यंत आणलं, आता लढाई जिहे-कटापूर, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावे व मार्डी परिसरातील १४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी आहे. शासनाला जाग आणण्यासाठी यापुढील काळात आंदोलन करावे लागेल तरी मागे हटणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.म्हसवड, ता. माण येथे माणगंगा नदीत उरमोडी पाण्याच्या पूजन कार्यक्रमानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती अक्काताई मासाळ, उपसभापती अतुल जाधव, म्हसवडचे नगराध्यक्ष रवींद्र वीरकर, उपनगराध्यक्ष रूपाली कोले, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, सोनिया गोरे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, विजय धट, प्रतिभा लोखंडे, वैशाली लोखंडे, मार्केट कमिटीचे सभापती अरुण गोरे, भीमराव पाटील, दिगंबर आगवणे, किरण बर्गे, दादासाहेब काळे, बाळासाहेब माने, विशाल बागल, सोमनाथ भोसले, संजय जगताप, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, शंकर वीरकर, डॉ. वसंत मासाळ, मारुती वीरकर, अकिल काझी, बाळासाहेब पिसे, लुनेश वीरकर आदी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘आजवर निवडणुका आल्या की तोच जाहीरनामा असायचा. त्यामध्ये माण-खटावच्या पाणीप्रश्न व सर्वांगीण विकास हे दोन कायम वाक्ये; पण मी पहिली निवडणूक लढवताना माणच्या मातीला पाणी देणार व सर्वांगीण विकास करणार ही आश्वासने दिली. ती पूर्णत्वास जात असल्याने मला याचा अभिमान आहे. यासाठी अनेक अडचणींवर मात करत अखेर उरमोडीचे पाणी माणच्या मातीत आणण्यात यशस्वी झालो. तरी या पुढील लढाई जिहे-कटापूर योजनेसाठीची आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी २५० कोटींचा निधी मिळवण्यासाठी, वरकुटे मलवडी परिसरातील १३ गावांचा व मार्डी परिसरातील १४ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. यासाठी मला तुमच्या साथीची व पाठबळाची गरज आहे. दुष्काळी जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी लढलो. उरमोडीचे आलेले पाणी जपून वापरा, पावसाचे पडणारे पाणी आडवण्याची साधने निर्माण केली. जलयुक्त शिवार योजनेची प्रथम माणमध्ये आम्ही सुरुवात केली. ही योजना नंतर राज्याने स्वीकारली. साखळी बंधाऱ्यांचा पायलट प्रोजेक्ट, कोल्हापूर टाईप बंधारे या सर्व संकल्पना माण-खटावच्या मातीत पहिल्यांदा माझ्या प्रयत्नातून व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठबळाने सुरू करण्यात यशस्वी झालो. नंतर यासर्व संकल्पना राज्याने स्वीकारल्या. याचा अभिमान आहे.’चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘मी जेव्हा पहिल्यांदा म्हसवडमध्ये आले तेव्हा येथील जनतेच्या पाणीप्रश्नासाठी आंदोलन करण्यासाठी आले. या आंदोलनानंतर अटकही झाली. परंतु पाणीप्रश्नासाठी या भागात आले व नंतर मी येथीलच झाले. दुष्काळी जनतेची दु:खे मी पाहिली असून, आपल्याला पाणीदार आमदार मिळाल्याने या भागात पाणी आले आहे. येथील ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात नगरप्रदक्षिणा, गावप्रदक्षिणेसाठी हजारो भक्तगण जात असतात. तसेच आजवर कोरड्या नदीत येथील सुवासिनी दीपोत्सव साजरा करत. परंतु आता ते दिवस संपले असून, यापुढील काळात नदीतील पाण्यातच दीपोत्सव साजरा होणार आहे. हे आ. गोरे भाऊंमुळे शक्य होणार आहे.’ (प्रतिनिधी) चांगल्या कामावर टिवटिव नको... बंधारा कोणी आणला, पाणी कोणी आणले यासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. हे सर्व कोणी आणले हे माझ्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी आपली टीव टीव बंद करावी. चांगले करता येत नसेल तर किमान झालेल्या समाजोपयोगी कामांवर तक्रारी तर करू नये, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.