शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

उरमोडीचे पाणी आमदारांमुळेच !

By admin | Updated: September 4, 2016 23:50 IST

दत्तात्रय हांगे : विनाकरण टीका करण्याची भाजपची धडपड; त्यांना आता जनताच जागा दाखवेल

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी खटाव-माण तालुक्यांत आणण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी गेली साडेसहा वर्षे केलेले प्रयत्न जनतेने पाहिले आहेत. आताही पावसाळी अधिवेशनात त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच उरमोडीचे पाणी माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात साठले आहे. माणमधील जनतेला पाणी आल्याने मोठा आनंद झाला. मात्र, डॉ. दिलीप येळगावकर आणि भाजपा आमदार गोरेंवर टीका करण्याची केविलवाणी धडपड करत आहेत. जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा लवकरच कळेल,’ असा टोला काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. दत्तात्रय हांगे यांनी लगावला. दहिवडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. हांगे म्हणाले, ‘आ. जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या कार्यकाळात रात्रंदिवस परिश्रम करून उरमोडीसह इतर पाणी योजनांच्या कामांना गती दिली. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघात पाणी आणण्याचा शब्द जनतेला दिला होता. प्रयत्नपूर्वक त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला. खटाव तालुक्यानंतर आमदारांनी उरमोडीचे पाणी दोन वर्षांपूर्वी माणमध्येही आणले. हजारोंच्या साक्षीने माणमध्ये त्या पाण्याचे स्वागत झाले होते. जनतेने त्यांना जलनायक ही उपाधी मोठ्या विश्वासाने बहाल केली आहे. त्यानंतर अनेक वेळा उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणून दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न आ. गोरेंनी केला आहे. पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे मागणी करून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पावसाचे वाहून जाणारे पाणी उचलून दुष्काळी माण-खटावला आ. जयकुमार गोरेंनीच आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उरमोडी ही एकच उपसा सिंचन योजना अशा प्रकारे सुरू आहे. खटाव तालुक्यातून उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आणि आता माणगंगा नदीतून बंधारे भरत पुढे चालले आहे. पाण्याचे महत्त्व आ. गोरेंना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच त्यांनी पाणी सोडण्याची मुदत वाढवून घेतली आहे. माणदेशी जनता त्यांना कायम धन्यवाद देत आली आहे. पळशीत पाणी पूजनासाठी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने जनता आली.’ (प्रतिनिधी) विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार... बंधाऱ्याच्या कामाबाबत बरळणाऱ्यांनी आ. गोरेंनी आजपर्यंत मतदार संघात ५०० सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केल्याचे बहुदा माहीत नसावे. माण-खटावमधील बंधाऱ्यांच्या पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्याने स्वीकारावा, हे त्यांना दिसले नाही का? दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आ. गोरेंवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांना अद्याप हे आणि या अगोदर आलेले पाणी उरमोडीचेच आहे. यावर विश्वास बसला नाही. राज्यात सत्तेत असल्याने त्यांचेच कार्यकर्ते पाणी बंद करा. नाहीतर आगामी निवडणुकीत आपले काही खरे नाही, असे वरिष्ठांना सांगत आहेत. पाणी बंद करण्यासाठी धडपडणारी भाजप कुठे आणि आणखी वाढीव दिवसांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करणारे आ. गोरे कुठे, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळेच पळशी गावाने आ. गोरेंची दोन्ही विधानसभा निवडणुकीत पाठराखण केली. माणदेशी जनता यापुढेही त्यांच्या पाठीशी ठाम राहून विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार आहे, असा विश्वासही अ‍ॅड. हांगे यांनी व्यक्त केला. पुतणा-मावशीची कळवळा ४परिश्रमाने आणलेले पाणी पाहण्यासाठी आमदारांनी दुचाकीवरून रपेट मारली. दुष्काळ हटविणे हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. त्या कामात श्रेयवाद नकोच, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच न करणारे पुतणा-मावशीचा कळवळा आणत आहेत असा टोलाही या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. हांगे यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.