शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

उरमोडीचे पाणी आमदारांमुळेच !

By admin | Updated: September 4, 2016 23:50 IST

दत्तात्रय हांगे : विनाकरण टीका करण्याची भाजपची धडपड; त्यांना आता जनताच जागा दाखवेल

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी खटाव-माण तालुक्यांत आणण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी गेली साडेसहा वर्षे केलेले प्रयत्न जनतेने पाहिले आहेत. आताही पावसाळी अधिवेशनात त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच उरमोडीचे पाणी माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात साठले आहे. माणमधील जनतेला पाणी आल्याने मोठा आनंद झाला. मात्र, डॉ. दिलीप येळगावकर आणि भाजपा आमदार गोरेंवर टीका करण्याची केविलवाणी धडपड करत आहेत. जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा लवकरच कळेल,’ असा टोला काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. दत्तात्रय हांगे यांनी लगावला. दहिवडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. हांगे म्हणाले, ‘आ. जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या कार्यकाळात रात्रंदिवस परिश्रम करून उरमोडीसह इतर पाणी योजनांच्या कामांना गती दिली. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघात पाणी आणण्याचा शब्द जनतेला दिला होता. प्रयत्नपूर्वक त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला. खटाव तालुक्यानंतर आमदारांनी उरमोडीचे पाणी दोन वर्षांपूर्वी माणमध्येही आणले. हजारोंच्या साक्षीने माणमध्ये त्या पाण्याचे स्वागत झाले होते. जनतेने त्यांना जलनायक ही उपाधी मोठ्या विश्वासाने बहाल केली आहे. त्यानंतर अनेक वेळा उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणून दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न आ. गोरेंनी केला आहे. पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे मागणी करून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पावसाचे वाहून जाणारे पाणी उचलून दुष्काळी माण-खटावला आ. जयकुमार गोरेंनीच आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उरमोडी ही एकच उपसा सिंचन योजना अशा प्रकारे सुरू आहे. खटाव तालुक्यातून उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आणि आता माणगंगा नदीतून बंधारे भरत पुढे चालले आहे. पाण्याचे महत्त्व आ. गोरेंना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच त्यांनी पाणी सोडण्याची मुदत वाढवून घेतली आहे. माणदेशी जनता त्यांना कायम धन्यवाद देत आली आहे. पळशीत पाणी पूजनासाठी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने जनता आली.’ (प्रतिनिधी) विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार... बंधाऱ्याच्या कामाबाबत बरळणाऱ्यांनी आ. गोरेंनी आजपर्यंत मतदार संघात ५०० सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केल्याचे बहुदा माहीत नसावे. माण-खटावमधील बंधाऱ्यांच्या पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्याने स्वीकारावा, हे त्यांना दिसले नाही का? दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आ. गोरेंवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांना अद्याप हे आणि या अगोदर आलेले पाणी उरमोडीचेच आहे. यावर विश्वास बसला नाही. राज्यात सत्तेत असल्याने त्यांचेच कार्यकर्ते पाणी बंद करा. नाहीतर आगामी निवडणुकीत आपले काही खरे नाही, असे वरिष्ठांना सांगत आहेत. पाणी बंद करण्यासाठी धडपडणारी भाजप कुठे आणि आणखी वाढीव दिवसांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करणारे आ. गोरे कुठे, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळेच पळशी गावाने आ. गोरेंची दोन्ही विधानसभा निवडणुकीत पाठराखण केली. माणदेशी जनता यापुढेही त्यांच्या पाठीशी ठाम राहून विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार आहे, असा विश्वासही अ‍ॅड. हांगे यांनी व्यक्त केला. पुतणा-मावशीची कळवळा ४परिश्रमाने आणलेले पाणी पाहण्यासाठी आमदारांनी दुचाकीवरून रपेट मारली. दुष्काळ हटविणे हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. त्या कामात श्रेयवाद नकोच, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच न करणारे पुतणा-मावशीचा कळवळा आणत आहेत असा टोलाही या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. हांगे यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.