शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीचे पाणी आमदारांमुळेच !

By admin | Updated: September 4, 2016 23:50 IST

दत्तात्रय हांगे : विनाकरण टीका करण्याची भाजपची धडपड; त्यांना आता जनताच जागा दाखवेल

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी खटाव-माण तालुक्यांत आणण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी गेली साडेसहा वर्षे केलेले प्रयत्न जनतेने पाहिले आहेत. आताही पावसाळी अधिवेशनात त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच उरमोडीचे पाणी माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात साठले आहे. माणमधील जनतेला पाणी आल्याने मोठा आनंद झाला. मात्र, डॉ. दिलीप येळगावकर आणि भाजपा आमदार गोरेंवर टीका करण्याची केविलवाणी धडपड करत आहेत. जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा लवकरच कळेल,’ असा टोला काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. दत्तात्रय हांगे यांनी लगावला. दहिवडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. हांगे म्हणाले, ‘आ. जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या कार्यकाळात रात्रंदिवस परिश्रम करून उरमोडीसह इतर पाणी योजनांच्या कामांना गती दिली. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघात पाणी आणण्याचा शब्द जनतेला दिला होता. प्रयत्नपूर्वक त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला. खटाव तालुक्यानंतर आमदारांनी उरमोडीचे पाणी दोन वर्षांपूर्वी माणमध्येही आणले. हजारोंच्या साक्षीने माणमध्ये त्या पाण्याचे स्वागत झाले होते. जनतेने त्यांना जलनायक ही उपाधी मोठ्या विश्वासाने बहाल केली आहे. त्यानंतर अनेक वेळा उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणून दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न आ. गोरेंनी केला आहे. पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे मागणी करून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पावसाचे वाहून जाणारे पाणी उचलून दुष्काळी माण-खटावला आ. जयकुमार गोरेंनीच आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उरमोडी ही एकच उपसा सिंचन योजना अशा प्रकारे सुरू आहे. खटाव तालुक्यातून उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आणि आता माणगंगा नदीतून बंधारे भरत पुढे चालले आहे. पाण्याचे महत्त्व आ. गोरेंना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच त्यांनी पाणी सोडण्याची मुदत वाढवून घेतली आहे. माणदेशी जनता त्यांना कायम धन्यवाद देत आली आहे. पळशीत पाणी पूजनासाठी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने जनता आली.’ (प्रतिनिधी) विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार... बंधाऱ्याच्या कामाबाबत बरळणाऱ्यांनी आ. गोरेंनी आजपर्यंत मतदार संघात ५०० सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केल्याचे बहुदा माहीत नसावे. माण-खटावमधील बंधाऱ्यांच्या पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्याने स्वीकारावा, हे त्यांना दिसले नाही का? दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आ. गोरेंवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांना अद्याप हे आणि या अगोदर आलेले पाणी उरमोडीचेच आहे. यावर विश्वास बसला नाही. राज्यात सत्तेत असल्याने त्यांचेच कार्यकर्ते पाणी बंद करा. नाहीतर आगामी निवडणुकीत आपले काही खरे नाही, असे वरिष्ठांना सांगत आहेत. पाणी बंद करण्यासाठी धडपडणारी भाजप कुठे आणि आणखी वाढीव दिवसांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करणारे आ. गोरे कुठे, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळेच पळशी गावाने आ. गोरेंची दोन्ही विधानसभा निवडणुकीत पाठराखण केली. माणदेशी जनता यापुढेही त्यांच्या पाठीशी ठाम राहून विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार आहे, असा विश्वासही अ‍ॅड. हांगे यांनी व्यक्त केला. पुतणा-मावशीची कळवळा ४परिश्रमाने आणलेले पाणी पाहण्यासाठी आमदारांनी दुचाकीवरून रपेट मारली. दुष्काळ हटविणे हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. त्या कामात श्रेयवाद नकोच, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच न करणारे पुतणा-मावशीचा कळवळा आणत आहेत असा टोलाही या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. हांगे यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.