शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीचे पाणी आमदारांमुळेच !

By admin | Updated: September 4, 2016 23:50 IST

दत्तात्रय हांगे : विनाकरण टीका करण्याची भाजपची धडपड; त्यांना आता जनताच जागा दाखवेल

दहिवडी : ‘उरमोडी योजनेचे पाणी खटाव-माण तालुक्यांत आणण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी गेली साडेसहा वर्षे केलेले प्रयत्न जनतेने पाहिले आहेत. आताही पावसाळी अधिवेशनात त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच उरमोडीचे पाणी माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात साठले आहे. माणमधील जनतेला पाणी आल्याने मोठा आनंद झाला. मात्र, डॉ. दिलीप येळगावकर आणि भाजपा आमदार गोरेंवर टीका करण्याची केविलवाणी धडपड करत आहेत. जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा लवकरच कळेल,’ असा टोला काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. दत्तात्रय हांगे यांनी लगावला. दहिवडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. हांगे म्हणाले, ‘आ. जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या कार्यकाळात रात्रंदिवस परिश्रम करून उरमोडीसह इतर पाणी योजनांच्या कामांना गती दिली. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघात पाणी आणण्याचा शब्द जनतेला दिला होता. प्रयत्नपूर्वक त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला. खटाव तालुक्यानंतर आमदारांनी उरमोडीचे पाणी दोन वर्षांपूर्वी माणमध्येही आणले. हजारोंच्या साक्षीने माणमध्ये त्या पाण्याचे स्वागत झाले होते. जनतेने त्यांना जलनायक ही उपाधी मोठ्या विश्वासाने बहाल केली आहे. त्यानंतर अनेक वेळा उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आणून दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न आ. गोरेंनी केला आहे. पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे मागणी करून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पावसाचे वाहून जाणारे पाणी उचलून दुष्काळी माण-खटावला आ. जयकुमार गोरेंनीच आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उरमोडी ही एकच उपसा सिंचन योजना अशा प्रकारे सुरू आहे. खटाव तालुक्यातून उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माण तालुक्यात आणि आता माणगंगा नदीतून बंधारे भरत पुढे चालले आहे. पाण्याचे महत्त्व आ. गोरेंना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच त्यांनी पाणी सोडण्याची मुदत वाढवून घेतली आहे. माणदेशी जनता त्यांना कायम धन्यवाद देत आली आहे. पळशीत पाणी पूजनासाठी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने जनता आली.’ (प्रतिनिधी) विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार... बंधाऱ्याच्या कामाबाबत बरळणाऱ्यांनी आ. गोरेंनी आजपर्यंत मतदार संघात ५०० सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केल्याचे बहुदा माहीत नसावे. माण-खटावमधील बंधाऱ्यांच्या पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्याने स्वीकारावा, हे त्यांना दिसले नाही का? दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आ. गोरेंवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांना अद्याप हे आणि या अगोदर आलेले पाणी उरमोडीचेच आहे. यावर विश्वास बसला नाही. राज्यात सत्तेत असल्याने त्यांचेच कार्यकर्ते पाणी बंद करा. नाहीतर आगामी निवडणुकीत आपले काही खरे नाही, असे वरिष्ठांना सांगत आहेत. पाणी बंद करण्यासाठी धडपडणारी भाजप कुठे आणि आणखी वाढीव दिवसांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करणारे आ. गोरे कुठे, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळेच पळशी गावाने आ. गोरेंची दोन्ही विधानसभा निवडणुकीत पाठराखण केली. माणदेशी जनता यापुढेही त्यांच्या पाठीशी ठाम राहून विरोधकांना उरमोडीचे पाणी पाजणार आहे, असा विश्वासही अ‍ॅड. हांगे यांनी व्यक्त केला. पुतणा-मावशीची कळवळा ४परिश्रमाने आणलेले पाणी पाहण्यासाठी आमदारांनी दुचाकीवरून रपेट मारली. दुष्काळ हटविणे हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. त्या कामात श्रेयवाद नकोच, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, पाण्यासाठी काहीच न करणारे पुतणा-मावशीचा कळवळा आणत आहेत असा टोलाही या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. हांगे यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.