शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

उरमोडीच्या पाण्याबद्दल राजकारण नको

By admin | Updated: August 28, 2016 23:57 IST

जयकुमार गोरे : पाणीपूजन उत्साहात; पळशीत बंधारे भरायला प्रारंभ

पळशी : ‘माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहिली आहे. या भागात पाणी येऊन दुष्काळी कलंक पुसला जावा, अशी कित्येक वर्षांपासून जनता अपेक्षा करत आहे. आजचा दिवस माणगंगा नदीसाठी ऐतिहासिक आहे. उरमोडीच्या पाण्याने माणगंगेवरील बंधारे भरत असून, अपेक्षा पूर्ण होत आहे. या पाण्यासाठी गेली सात वर्षे जीवापाड परिश्रम केले आहे. पाण्याचे मोल जाणून त्याचा काटकसरीने वापर करा. या पाण्याबाबत कुणीही राजकारण करू नका,’ असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी केले. पळशी, ता. माण येथे उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी म्हसवडचे नगराध्यक्ष रवींद्र वीरकर, माजी नगराध्यक्ष विजय धट, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, डी. एम. अब्दागिरे, लुनेश वीरकर, अकील काझी, बाळासाहेब पिसे, अ‍ॅड. दत्तात्रय हांगे, लक्ष्मण माळवे, उद्धव लव्हाळे, संजय खाडे, दिलीप खाडे, तुकाराम खाडे, एल. डी. खाडे, रघुनाथ हांगे, एकनाथ सावंत, आनंदा देवकुळे, अण्णा नाकाडे, राजू जाधव, उमेश पाटोळे, सागर हांगे व ग्रामस्थ उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, ‘गेल्या सात वर्षांपूर्वी मी माण-खटावच्या जनतेला पाणी आणण्याचे स्वप्न दाखविले. पहिल्यांदा आमदार होताना साडेतीन वर्षांत पाणी आणण्याचा शब्द दिला. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. जनतेच्या विश्वासावर प्रयत्नांची वाटचाल सुरू ठेवल्याने प्रयत्नांना यश आले. उरमोडीचे पाणी साडेतीन वर्षांत खटावला व नंतर पुढे माण तालुक्यात आणले, प्रयत्न करणाऱ्यांवरच टीका केली जाते. गोड फळे देणाऱ्या आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात. या निसर्ग नियमाप्रमाणे पाण्यासाठी काहीच योगदान न देणाऱ्यांनी आणलेल्या पाण्याबाबत गळे काढले. काही महाभागांनी तर कुठे आहे पाणी? असे म्हणत केकाटायलाही मागेपुढे पाहिले नाही. उरमोडीचे पाणी दोन वर्षे खटाव तालुक्यात आले, माणमध्येही आले. अगदी म्हसवडपर्यंत माणगंगेद्वारे पोहोचले. तरीही सवयीप्रमाणे काहींनी त्यात नेहमीच राजकारण आणले. कोण काय बोलतो, याच्याशी काही देणे-घेणे नाही. माझी बांधिलकी इथल्या जनतेप्रती आहे. इथल्या मातीला दुष्काळी संबोधलेले मला चालणार नाही, त्यासाठी ही धडपड सुरू आहे.’ पावसाळ्यात उरमोडी धरणातून वाया जाणारे पाणी माण-खटावला देण्यात यावे, अशी मागणी अधिवेशनात केली. जलसंपदामंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली. उरमोडीचे पाणी आता माणमध्ये आले आहे. अ‍ॅड. दत्तात्रय हांगे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) माणमध्ये माझेच सरकार! ‘उरमोडीचे पाणी खूप परिश्रमाने आणलेय. त्यासाठी सात वर्षे खर्ची घातलीत, ते पाणी जपून वापरा, असे सांगतानाच ज्यांना ५ वर्षांत स्वत:च्या अंघोळीपुरतेच पाणी आणता आले नाही. त्यांना पाण्यावर बोलण्याचा अधिकारच नाही,’ असा टोला आ. गोरेंनी लगावला. राज्यात सरकार कुणाचेही असो; माण-खटावमध्ये मात्र जयकुमारचेच सरकार आहे. समोरची जनता बरोबर असेपर्यंत ते कायमच राहील, असेही त्यांनी सांगितले.