शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडी' आणखी किती बळी घेणार?

By admin | Updated: May 13, 2014 11:14 IST

रविवारी दुपारी पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने गेल्या चार-पाच वर्षांत आतापर्यंत या धरणाने घेतलेल्या बळींची संख्या १४ झाली आहे.

 

परळी : माण-खटावला वरदायिनी ठरणारे उरमोडी धरण दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या कारणावरून बारमाही चर्चेत आहे. रविवारी दुपारी पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने गेल्या चार-पाच वर्षांत आतापर्यंत या धरणाने घेतलेल्या बळींची संख्या १४ झाली आहे. हा जलाशय अजून किती बळी घेणार, अशी चर्चा परिसरात होत आहे. सातारा जिल्ह्यातील एक मोठे धरण म्हणून आणि माण-खटाव या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारे धरण म्हणून ख्याती मिळविलेल्या उरमोडी धरणाचे नाव वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत आहे. या धरणाने गेल्या पाच वर्षांत तब्बल १४ बळी घेतले आहेत. या जलाशयामध्ये गावातून जाणार्‍या कोणत्याही रस्त्यावर किंवा असुरक्षित ठिकाणी धोक्याच्या सूचना देणारे फलक बसविलेले नाहीत. तसेच या परिसरात जलाशयालगत सुमारे १५-१६ गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. परंतु त्यातील एकाही ठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक नाही. परिसरातील हौशी तरुण पोहण्यासाठी जलाशयात जातात. तसेच परिसरातील ग्रामस्थ जनावरे चारण्यासाठीही जलाशयालगतच्या परिसरात वावरतात. पाणी पिण्यासाठी जनावरांना जलाशयाकडे नेतात. शेळी, म्हैस, गाय, बैल अशी १५ ते २0 जनावरे आतापर्यंत या जलाशयात बुडाली आहेत. काही वेळा घरगुती वादातून, प्रेमातील भांडणातून काही तरुणांनी येथे आत्महत्या केल्या आहेत. जलाशयालगत मद्यप्राशन करून धिंगाणा घालणार्‍यांपैकी काही जण अतिउत्साहामुळे जलाशयात बुडाले आहेत. एवढय़ा घटना घडूनही कृष्णा खोरे विकास महामंडळ किंवा उरमोडी विभागाला अजूनही जाग आलेली नाही. तसेच उरमोडी धरणाची सुमारे तीन किलोमीटर लांबीची भिंत व १0.२0 टीएमसी क्षमतेचा जलाशय असून, संरक्षणासाठी फक्त एकच संरक्षक नेमण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभरात प्रेमी युगुले, कुटुंबे, मुलांचे गट, हुल्लडबाजी करणारे तरुण, जलाशयात उतरून दंगामस्ती करताना दिसतात. अशा दंगामस्तीमुळे व्यक्ती बुडाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. दोन आत्महत्या झाल्या असून, जनावरांना पाण्यावर नेण्यासाठी गेलेल्या व्यक्ती बुडाल्याच्या तीन तर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या व्यक्ती बुडून मृत्युमुखी पडल्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या प्रकारांना आणि बळींना कधी आळा बसणार आणि हा जलाशय आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहे. (वार्ताहर) फलक केव्हा लागणार? ■ उरमोडी जलाशयानजीक सुमारे १५-१६ गावे आहेत. चार-पाच ठिकाणी धोकादायक क्षेत्र आहे. परंतु त्याठिकाणी कोणतेही धोक्याचे फलक लावलेले नाहीत. सूचना व मार्गदर्शन नव्याने येणार्‍यांना मिळत नाही. केवळ पावसाळ्यातच पाण्याची पातळी दर्शविणारे फलक लावले जात असल्याने धोक्याची सूचना आपोआप मिळते. एरवी, विशेषत: उन्हाळ्य़ात गर्दी जास्त असताना धोक्याची सूचना मिळतच नाही.