शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भादेच्या पीयूषची घरात अभ्यास करून यूपीएससीत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:00 IST

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिले.

स्वप्निल शिंदे सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिले. वकिलीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यांनी यशाला गवसणी घातली. खंडाळा तालुक्यातील भादेयेथील पीयूष साळुंखे यांनी यूपीएससीत केंद्रात ६३वा तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.मूळचे भादे येथील रहिवासी असलेल्या पीयूष साळुंखे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकपुणे येथील सेंट विंसेन्ट हायस्कूलमधूनपूर्ण केले. त्यानंतर त्यांनीइलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. दरम्यान, लहानपणापासून वडिलांप्रमाणे वकील होण्याचे स्वप्न तेपाहत होते. म्हणून एलएलबीचे शिक्षण घेण्यास सुरुवातकेली. वकिलीचे शिक्षणघेत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्याससुरुवात केली.२०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली.पूर्व परीक्षेत यश मिळाले. मात्र,मुख्य परीक्षेत स्कोर कमी आल्याने अपयश आले. पहिल्या प्रयत्नात अपयशामुळे काही प्रमाणात निराशा आली. दरम्यान, आई-वडीलआणि मित्रांनी समजूत काढूनपुन्हा जोरात प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर निराशा झटकूनपियूष यांनी जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ च्या पूर्व,मुख्य परीक्षेत यश मिळवून मुलाखतीपर्यंत मजल मारली. पहिलीच मुलाखत असल्यानेकाही प्रमाणात दडपण होते. तरी न डगमगता त्याला सामोरे गेले.मुलाखत दिल्यानंतर एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देतपुन्हा यूपीएससीचा अभ्याससुरू केला अन् अपेक्षितपणे लागलेल्या निकालामुळे विश्वास बसत नव्हता की देशात ६३ वा क्रमांक मिळवला.लायब्ररी व क्लास न लावता केला अभ्यासकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत असताना पीयूष साळुंखे हे लायब्ररी व क्लास न लावता केवळ घरी बसून अभ्यास करीत होते. त्याचदरम्यान, एलएलबी, कॉलेज, जिमला जाणे, फिल्म पाहणे व मित्रमंडळींमध्येही वेळ घालवत होते.मुलाखतीत दृष्टीकोन पाहिला जातोमुख्य परीक्षेनंतर आयोगातर्फे घेण्यात आलेली मुलाखत केवळ २० मिनिटांची झाली. या वर्षी घेण्यात आलेल्या मुलाखतीत ती सर्वांत कमी वेळाची होती. त्यामुळे मुलाखत किती वेळ घेतली गेली हे महत्त्वाचे नाही, तर त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भविष्यातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा पद्धतीने देत आहे, हे महत्त्वाचे असते.