शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘अजिंक्यतारा’ची बिनविरोध हॅट्ट्रिक

By admin | Updated: March 29, 2016 23:52 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : कारखान्याचा ४० लाख रुपये खर्च वाचल्याचा दावा; कारखाना विद्युतबाबतीतही स्वयंपूर्ण

सातारा : ‘अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सभासदांच्या एकीमुळे सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. बिनविरोधच्या हॅट्ट्रिकमुळे कारखान्याचा ४० लाखांचा खर्च वाचला असून, विविधांगांनी कारखाना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न सभासदांच्या विश्वासामुळे फलदायी ठरत आहे,’ अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिवंगत अभयसिंहराजे भोसले शेंद्रे येथील उजाड माळरानावर अजिंक्यारा कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या अकाली निधनानंतरही त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सभासदांच्या मदतीने मी झटत आहे. अनेक अडचणींवर मात करून यंदाच्याही गळीत हंगामात शासन निर्धारित एफआरपीनुसार प्रती टनाला २३९२.६२ रुपये एवढा दर निश्चित झालेला आहे. त्यापैकी प्रतिटन २०१५ रुपये रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करण्यात आली आहे. २०१५-१६ च्या गळीत हंगामाला दि. ८ नोव्हेंबरला प्रारंभ होऊन आजअखेर ५ लाख ९१० मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२.६७ टक्के साखर उताऱ्याने ६ लाख ७ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. या गळीत हंगामात गाळपाचे एकूण उद्दिष्ट ६ लाख मे. टन असून, प्रतिदिन सुमारे ३,७७५.७० मे. टनाचे गाळप सुरू असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या गळीत हंगामात डिस्टिलरी विभागात आज अखेर ३१ लाख ७३ हजार लिटर रेक्टिफाईड स्पिरिटचे उत्पादन झाले असून, इथेनॉलचे १७ लाख ६६ हजार लिटर उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत आॅईल मार्केटिंग कंपनीला ११ लाख २० हजार लिटर इथेनॉल विक्री केली आहे. उसाला किफायतशीर दर व तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठीच या उद्देशाने कारखान्याचे कामकाज सुरू आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)