शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

अवकाळीचा जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिकांना फटका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST

सातारा : फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना ...

सातारा : फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर यामध्ये २ हजार १९६ शेतकरी बाधित झाले आहेत. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्याचबरोबर पावसासह मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या होत्या. यामुळे पिके आणि फळांचे नुकसान झाले होते. या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले होते. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले. अवकाळीतील नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ३७५.५० हेक्टरवरील पिके आणि बागांना फटका बसल्याचे दिसून आले.

अवकाळीचा फटका खटाव तालुक्यात अधिक करून बसला आहे. या तालुक्यात मोठमोठ्या गारा पडून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३३७ हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे, तर फळबागाखालील बाधित क्षेत्र ३० हेक्टर आहे. या तालुक्यातील १ हजार ८७९ शेतकऱ्यांना अवकाळीमुळे नुकसान सोसावे लागले आहे.

खटावनंतर वाई तालुक्यात अधिक नुकसान झाले आहे. वाईतील २६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला, तर २७६ शेतकरी बाधित झाले आहेत. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील ३ आणि महाबळेश्वरमधील २ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. इतर तालुक्यांत अवकाळीमुळे नुकसान झाले नसल्याचे पंचनाम्यावरून समोर आले आहे. दरम्यान, अवकाळी पावसात ज्वारी, गहू, हरभरा, मक्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे.

चौकट :

भरपाई लवकर देण्याची गरज...

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यामधील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. यामधून सावरत असतानाच फेब्रुवारीतील अवकाळी पावसाचा दोन हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पीक नुकसानीचे पैसे लवकर मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

.......................................................