शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अवकाळीचा जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिकांना फटका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST

सातारा : फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना ...

सातारा : फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर यामध्ये २ हजार १९६ शेतकरी बाधित झाले आहेत. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्याचबरोबर पावसासह मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या होत्या. यामुळे पिके आणि फळांचे नुकसान झाले होते. या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले होते. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले. अवकाळीतील नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ३७५.५० हेक्टरवरील पिके आणि बागांना फटका बसल्याचे दिसून आले.

अवकाळीचा फटका खटाव तालुक्यात अधिक करून बसला आहे. या तालुक्यात मोठमोठ्या गारा पडून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३३७ हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे, तर फळबागाखालील बाधित क्षेत्र ३० हेक्टर आहे. या तालुक्यातील १ हजार ८७९ शेतकऱ्यांना अवकाळीमुळे नुकसान सोसावे लागले आहे.

खटावनंतर वाई तालुक्यात अधिक नुकसान झाले आहे. वाईतील २६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला, तर २७६ शेतकरी बाधित झाले आहेत. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील ३ आणि महाबळेश्वरमधील २ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. इतर तालुक्यांत अवकाळीमुळे नुकसान झाले नसल्याचे पंचनाम्यावरून समोर आले आहे. दरम्यान, अवकाळी पावसात ज्वारी, गहू, हरभरा, मक्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे.

चौकट :

भरपाई लवकर देण्याची गरज...

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यामधील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. यामधून सावरत असतानाच फेब्रुवारीतील अवकाळी पावसाचा दोन हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पीक नुकसानीचे पैसे लवकर मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

.......................................................