शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिकांना फटका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST

सातारा : फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना ...

सातारा : फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर यामध्ये २ हजार १९६ शेतकरी बाधित झाले आहेत. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्याचबरोबर पावसासह मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या होत्या. यामुळे पिके आणि फळांचे नुकसान झाले होते. या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले होते. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले. अवकाळीतील नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ३७५.५० हेक्टरवरील पिके आणि बागांना फटका बसल्याचे दिसून आले.

अवकाळीचा फटका खटाव तालुक्यात अधिक करून बसला आहे. या तालुक्यात मोठमोठ्या गारा पडून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३३७ हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे, तर फळबागाखालील बाधित क्षेत्र ३० हेक्टर आहे. या तालुक्यातील १ हजार ८७९ शेतकऱ्यांना अवकाळीमुळे नुकसान सोसावे लागले आहे.

खटावनंतर वाई तालुक्यात अधिक नुकसान झाले आहे. वाईतील २६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला, तर २७६ शेतकरी बाधित झाले आहेत. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील ३ आणि महाबळेश्वरमधील २ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. इतर तालुक्यांत अवकाळीमुळे नुकसान झाले नसल्याचे पंचनाम्यावरून समोर आले आहे. दरम्यान, अवकाळी पावसात ज्वारी, गहू, हरभरा, मक्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे.

चौकट :

भरपाई लवकर देण्याची गरज...

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यामधील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. यामधून सावरत असतानाच फेब्रुवारीतील अवकाळी पावसाचा दोन हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पीक नुकसानीचे पैसे लवकर मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

.......................................................