शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

जिल्ह्यात अवकाळीचा फटका सुरूच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून ...

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून पिके आणि फळबागांवर औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत चालला आहे.

जिल्ह्यातील बळिराजा मागील चार-पाच वर्षांपासून सतत निसर्गाशी सामना करत आला आहे. कधी दुष्काळाचा, तर काहीवेळा अतिवृष्टीशी मुकाबला करावा लागतोय. अधूनमधून अवकाळी पाऊसही तडाखा देत आहे. यामुळे सावरुन उभा राहायचे म्हटले तरी पुन्हा आणखी फटका बसतो. जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तर २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झालेली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पिकांसाठी खराब वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, मका अशी पिके घेतली आहेत. या पिकांवर रोग पडण्याची अधिक शक्यता आहे, तर डाळिंब आणि द्राक्षसारख्या बागांवरही रोगाचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळिराजा कीटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

फोटो दि.०८सातारा अ‍ॅग्रो फोटो...

फोटो ओळ : ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात कांदा पिकांवर शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.

...................................................