शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

जिल्ह्यात अवकाळीचा फटका सुरूच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून ...

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून पिके आणि फळबागांवर औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत चालला आहे.

जिल्ह्यातील बळिराजा मागील चार-पाच वर्षांपासून सतत निसर्गाशी सामना करत आला आहे. कधी दुष्काळाचा, तर काहीवेळा अतिवृष्टीशी मुकाबला करावा लागतोय. अधूनमधून अवकाळी पाऊसही तडाखा देत आहे. यामुळे सावरुन उभा राहायचे म्हटले तरी पुन्हा आणखी फटका बसतो. जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तर २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झालेली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पिकांसाठी खराब वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, मका अशी पिके घेतली आहेत. या पिकांवर रोग पडण्याची अधिक शक्यता आहे, तर डाळिंब आणि द्राक्षसारख्या बागांवरही रोगाचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळिराजा कीटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

फोटो दि.०८सातारा अ‍ॅग्रो फोटो...

फोटो ओळ : ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात कांदा पिकांवर शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.

...................................................