शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तोपर्यंत झोपडपट्टीवासीयांचा लढा थांबणार नाही; भारत पाटणकर

By सचिन काकडे | Updated: January 16, 2024 16:49 IST

मोफत घरांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा : मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेप्रमाणे आकाशवाणी झोपडपट्टीवासीयांचे अन्यत्र स्थलांतर करताना प्रशासनाने त्यांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा द्याव्यात. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर त्यात मोफत घरे द्यावीत. जो कायदा मुंबईत लागू आहे, तोच येथेही लागू पडतो. प्रशासन मोफत घरांबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केला.

सातारा पालिकेच्या वतीने करंजे पेठ येथे झोपडपट्टीवासीयांसाठी प्रधानमंत्री आवास योजना साकारली जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रति सात लाख रुपये भरावे लागणार आहेत. शासनाच्या निर्णयाविरोधात झोपडपट्टीवासीय आक्रमक झाले असून, आपल्या न्याय हक्कासह मोफत घरांसाठी त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा केला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी माजगावकर माळ आकाशवाणी झोपडपट्टी संघर्ष कृती समितीच्या वतीने आकाशवाणी झोपडपट्टी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिकांसह विविध संघटनांनी सहभाग नोंदवला.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, आकाशवाणी, माजगावकर माळ येथील झोपडपट्टीधारक गेल्या ४०-५० वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत. हे रहिवासी येथील भोगवटदार असून, याचे सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत. कायद्याने या भोगवटदारांना कोठेही स्थलांतरित करता येत नाही. मात्र पालिका प्रशासनाकडून या झोपडपट्टीवासीयांची घरे पाडून त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यासाठी चांगली घरे उभारण्याची योजना जर शासन राबवत असेल तर झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर करताना त्यांना चांगला निवारा, वीज, पाणी, स्वच्छतागृह अशा सर्व सेवा द्यायला हव्यात. मुंबईमध्ये झोपडपट्टी विकास, बीडीडी चाळ पुनर्वसनाचे काम अशाच पद्धतीने सुरू आहे. जो कायदा त्यांना लागू होतो तोच कायदा येथेही लागू होतो. त्यामुळे शासन जोपर्यंत मोफत घराबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. 

संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात संबंधित विभाग, अधिकारी व संघर्ष समितीची बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.