शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत झोपडपट्टीवासीयांचा लढा थांबणार नाही; भारत पाटणकर

By सचिन काकडे | Updated: January 16, 2024 16:49 IST

मोफत घरांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा : मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेप्रमाणे आकाशवाणी झोपडपट्टीवासीयांचे अन्यत्र स्थलांतर करताना प्रशासनाने त्यांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा द्याव्यात. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर त्यात मोफत घरे द्यावीत. जो कायदा मुंबईत लागू आहे, तोच येथेही लागू पडतो. प्रशासन मोफत घरांबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केला.

सातारा पालिकेच्या वतीने करंजे पेठ येथे झोपडपट्टीवासीयांसाठी प्रधानमंत्री आवास योजना साकारली जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रति सात लाख रुपये भरावे लागणार आहेत. शासनाच्या निर्णयाविरोधात झोपडपट्टीवासीय आक्रमक झाले असून, आपल्या न्याय हक्कासह मोफत घरांसाठी त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा केला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी माजगावकर माळ आकाशवाणी झोपडपट्टी संघर्ष कृती समितीच्या वतीने आकाशवाणी झोपडपट्टी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिकांसह विविध संघटनांनी सहभाग नोंदवला.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, आकाशवाणी, माजगावकर माळ येथील झोपडपट्टीधारक गेल्या ४०-५० वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत. हे रहिवासी येथील भोगवटदार असून, याचे सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत. कायद्याने या भोगवटदारांना कोठेही स्थलांतरित करता येत नाही. मात्र पालिका प्रशासनाकडून या झोपडपट्टीवासीयांची घरे पाडून त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यासाठी चांगली घरे उभारण्याची योजना जर शासन राबवत असेल तर झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर करताना त्यांना चांगला निवारा, वीज, पाणी, स्वच्छतागृह अशा सर्व सेवा द्यायला हव्यात. मुंबईमध्ये झोपडपट्टी विकास, बीडीडी चाळ पुनर्वसनाचे काम अशाच पद्धतीने सुरू आहे. जो कायदा त्यांना लागू होतो तोच कायदा येथेही लागू होतो. त्यामुळे शासन जोपर्यंत मोफत घराबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. 

संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात संबंधित विभाग, अधिकारी व संघर्ष समितीची बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.