शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग ही पिके घेतली जातात. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग ही पिके घेतली जातात. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने रब्बीची पिके वाया जाऊन उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी हंगामात पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने ज्वारी, हरभरा, गहू, आदी पिकांची जोमाने वाढ झाली आहे. मात्र, ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. गेले दोन दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल झालेला आहे. वातावरणातील गारठा कमी झाला असून, ढगाळ वातावरणामुळे गव्हावर तांबेरा रोग पडल्याचे दिसत आहे. ज्वारीच्या पानांवर चिकटा, मवा कीड पडली असून, हरभऱ्यावर घाट पडण्याची शक्यता आहे. या प्रतिकूल वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होणार असून, उत्पादनात घट होईल, असे शेतकत्यांनी सांगितले.

(कोट)

शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावरच अवलंबून आहे. यावर्षी मोसमी पावसाने साथ दिल्याने रब्बीच्या हंगामातील पिके चांगली आहेत. अशातच बदलत्या वातावरणामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांवर रोग पडला असून, अवकाळी पावसाचाही पिकांना फटका बसणार आहे. याचा उत्पादनावर परिणाम होईल.

- संजय ननावरे, शेतकरी

........................................

सकाळी सूर्याचे दर्शन नाही

कुडाळ : वातावरणातील बदलामुळे कुडाळ परिसरात दोन-तीन दिवसांपासून सकाळी सूर्यदर्शन घडतच नाही. आठ, नऊ वाजेपर्यंत संपूर्णतः ढगाळ छाया असते. पहाटेच्या वेळी धुक्याची झालर सगळीकडे पाहायला मिळत आहे. यामुळे ढगाआड लपलेला सूर्य मात्र काही दिसतच नाही.