शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

कऱ्हाड उत्तरेत अवकाळी पावसाचा शाळूला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

जिरायती विभागातील शेतकरी वर्षातून खरीप आणि रब्बीची पिके घेतात. त्यावरच त्याचे आर्थिक बजेट अवलंबून असते. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाला ...

जिरायती विभागातील शेतकरी वर्षातून खरीप आणि रब्बीची पिके घेतात. त्यावरच त्याचे आर्थिक बजेट अवलंबून असते. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने उत्पादन घटले. त्यातून शेतकरी सावरत असतानाच चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने शाळू पिकाला भुईसपाट करून टाकले. ऐन पोटऱ्यात आलेले पीक या पावसाने हिरावून घेतले.

शाळू आणि त्याचा कडबा यावर जिरायती विभातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. कऱ्हाड उत्तरमधील काही गावातील शेतकऱ्यांच्या शाळू पिकांचे अवेळी आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. एका वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान हे न सोसणारे असल्याने काय करावे, अशा विचारात शेतकरी आहेत. सोयाबीन पिकांचे पंचनामे केले. त्याचा लाभ मिळाला नसतानाच हातातोंडाशी आलेला शाळू पिकाचा घास पावसाने काढून घेतला. जमीन पाडून ठेवायची नाही म्हणूनच शेतकरी कसतोय, अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

- कोट

खरिपातील सोयाबीन अतिवृष्टीने गेले, तर जोमदार आलेले शाळू पीक अवेळी आलेल्या पावसाने भुईसपाट केले. शेती करावी की नको, अशी आमची अवस्था झाली आहे. माझे तीस गुंठे क्षेत्रावरील शाळू पीक भुईसपाट झाले आहे.

- पांडुरंग पोळ

शेतकरी, शामगाव

- चौकट

उत्पादन घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

सध्या शाळू पिकाला पोटरे पडले आहेत. मध्यंतरी थंडीचा प्रादुर्भाव वाढला होता. ही थंडी शाळू पिकाला पोषक असते. मात्र, थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. त्यातच काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस कोसळला. सध्याही ढगाळ वातावरण असून, अधूनमधून धुके पडत असल्याने कणसाला शाळूच्या जाळी होण्याचा धोका आहे. असे झाल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, शेतकरी चिंतेत आहेत.

फोटो : ०८केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड उत्तर विभागात काही क्षेत्रावरील शाळू पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे. (छाया : शंकर पोळ)