शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

कऱ्हाड उत्तरेत अवकाळी पावसाचा शाळूला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

जिरायती विभागातील शेतकरी वर्षातून खरीप आणि रब्बीची पिके घेतात. त्यावरच त्याचे आर्थिक बजेट अवलंबून असते. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाला ...

जिरायती विभागातील शेतकरी वर्षातून खरीप आणि रब्बीची पिके घेतात. त्यावरच त्याचे आर्थिक बजेट अवलंबून असते. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने उत्पादन घटले. त्यातून शेतकरी सावरत असतानाच चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने शाळू पिकाला भुईसपाट करून टाकले. ऐन पोटऱ्यात आलेले पीक या पावसाने हिरावून घेतले.

शाळू आणि त्याचा कडबा यावर जिरायती विभातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. कऱ्हाड उत्तरमधील काही गावातील शेतकऱ्यांच्या शाळू पिकांचे अवेळी आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. एका वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान हे न सोसणारे असल्याने काय करावे, अशा विचारात शेतकरी आहेत. सोयाबीन पिकांचे पंचनामे केले. त्याचा लाभ मिळाला नसतानाच हातातोंडाशी आलेला शाळू पिकाचा घास पावसाने काढून घेतला. जमीन पाडून ठेवायची नाही म्हणूनच शेतकरी कसतोय, अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

- कोट

खरिपातील सोयाबीन अतिवृष्टीने गेले, तर जोमदार आलेले शाळू पीक अवेळी आलेल्या पावसाने भुईसपाट केले. शेती करावी की नको, अशी आमची अवस्था झाली आहे. माझे तीस गुंठे क्षेत्रावरील शाळू पीक भुईसपाट झाले आहे.

- पांडुरंग पोळ

शेतकरी, शामगाव

- चौकट

उत्पादन घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

सध्या शाळू पिकाला पोटरे पडले आहेत. मध्यंतरी थंडीचा प्रादुर्भाव वाढला होता. ही थंडी शाळू पिकाला पोषक असते. मात्र, थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. त्यातच काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस कोसळला. सध्याही ढगाळ वातावरण असून, अधूनमधून धुके पडत असल्याने कणसाला शाळूच्या जाळी होण्याचा धोका आहे. असे झाल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, शेतकरी चिंतेत आहेत.

फोटो : ०८केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड उत्तर विभागात काही क्षेत्रावरील शाळू पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे. (छाया : शंकर पोळ)