शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बसस्थानकात लाल परी चालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या लाल परी चालक फलाटावर शिस्तीत गाड्या लावतात. मात्र शेवटचा थांबा ...

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या लाल परी चालक फलाटावर शिस्तीत गाड्या लावतात. मात्र शेवटचा थांबा सातारा असणारे चालक प्रवाशांना उतरण्यासाठी रस्त्यातच गाडी उभी करतात. त्यामुळे फलाटावरून मार्गस्थ होणाऱ्या गाड्या मागे घेताना अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात राज्यातील विविध आगारांतून साताऱ्यासाठी फेऱ्या सुरू असतात. बसस्थानकाचे प्रवेशाचे व बाहेर जाण्याचे गेट काही महिन्यांपूर्वी बदलले आहेत. पूर्वी सेव्हन स्टारजवळील गेटमधून आलेल्या गाड्या थेट आगाराच्या दारात जाऊन थांबत असत. त्यामुळे वाहनांची कोंडी होत नसायची. आता मात्र जंबो कोरोना सेंटरजवळील गेटमधून गाड्या आत जातात. पुढील प्रवासाला जाणाऱ्या गाड्या फलाटावर जाऊन थांबतात. मात्र ज्यांचा सातारा हा शेवटचा थांबा असतो. अशा गाड्या इतर विभागातून आलेल्या पुणे, मुंबई गाड्या थांबतात तेथे येऊन थांबतात. चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षेत जातात. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी होत असते.

कोट

पूर्वी जुन्या गेटमधून गाड्या आत येऊन थांबत, तेव्हा गाडीतून उतरल्याबरोबरच रिक्षा मिळत असायचे. तसेच शेजारीच एसटीडी सेंटर असल्याने नातेवाईक नेण्यासाठी येईपर्यंत आतमध्ये थांबता येत होते. आता या ठिकाणी गाडीतून उतरले, तर इतर गाड्यांचा वेढा पडलेला असतो. त्यामुळे सगळा गोंधळ वाढतो.

- मच्छिंद्र माने, सातारा.

कोट

मराठवाडा तसेच पुणे, मुंबईचे आई-वडील साताऱ्यात आले, तर त्यांच्याकडे मोबाईल नसतो. अशावेळी गाडीतून उतरल्याबरोबर एसटीडीत जाऊन, आपण आलो असल्याबाबत फोन करता येत होता. आम्हीही लगेच त्यांना आणायला इतर वाहन घेऊन जात होतो. आता थांबण्यासाठी सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असतात.

- सागर पंडित, सातारा.

चौकट

जुन्या पद्धतीने गेट सुरू करावे

सातारा मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रवेशद्वार व बाहेर जाण्याचा मार्ग पूर्वीप्रमाणे केल्यास बाहेरून आलेल्या गाड्या थेट आगाराच्या दारापर्यंत जाऊन थांबू शकतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना जागा उपलब्ध होऊ शकते. साहजिकच बसस्थानकासमोरील रस्त्यावर एसटीच्या रांगा लागणार नाहीत.

फोटो ओळ

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात बाहेरगावाहून शेवटचा थांबा घेऊन येणाऱ्या गाड्या रस्त्यातच थांबत असल्याने वाहनांची कोंडी होत असते. (छाया : जावेद खान)