शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कार्वे विभागातील शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:22 IST

कार्वे : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कार्वे परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ...

कार्वे : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कार्वे परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठी भुस्खलनही झाले आहे. कार्वे परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शिवार जलमय झाले असून ओढे, नाले भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाने भात, सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत.

- चौकट

मळे, कोळणे, पाथरपुंज संपर्कहीन

पाटण तालुक्यातील कोयना विभागातील मळे, कोळणे, पाथरपुंज या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. येथील नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाथरपुंज व मळे गावातील ग्रामस्थांशी कसलाच संपर्क होत नाही. त्यामुळे प्रशासन चिंतेत असून, विभागात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

- चौकट

टोळेवाडी मार्गावर दरड कोसळली

पाटण तालुक्यात गत ४८ तासांपासून तुफान पाऊस पडत असून, पाटण ते टोळेवाडी मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे टोळेवाडीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- चौकट (फोटो : २३केआरडी०३

राष्ट्रीय महामार्गावर चार फूट पाणी

रामापूर : कऱ्हाड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावर पाटणमधील बसस्थानक परिसरात चार फूट पाणी साचले असून, दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. व्यापारी, विक्रेत्यांचे साहित्य पाण्यात भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. तर साचलेल्या पाण्यातून प्रवाशांसह नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. धरणातून सोडलेल्या पाण्याचा परिणाम शहरात दिसू लागला आहे. नवीन बसस्थानक परिसर, कळके चाळ आणि कऱ्हाड-चिपळूण मार्गालगत असणाऱ्या दुकानात शुक्रवारी दुपारी पाणी शिरण्यास सुरुवात झाली.

- चौकट (फोटो : २३केआरडी०४)

मंद्रुळकोळे, खळे, कसणी, मालदनचे पूल पाण्याखाली

सणबूर : ढेबेवाडी ते पाटण मार्गावरील मंद्रुळकोळे गावाशेजारील वांग नदीवरील पूल पाण्याखाली आहे. त्यामुळे ढेबेवाडी विभागाचा पाटणशी संपर्क तुटला आहे, तसेच खळे येथील पूलही पाण्याखाली गेल्याने या विभागातील बारा वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे. वाल्मिक पठारावरील कसणी गावाजवळील फरशी पूल पाण्याखाली असल्याने कसणीसह, निगडे, घोटील, माईंगडेवाडी व इतर वाड्या वस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. मालदन व पवारवाडी येथील पूलही पाण्याखाली गेला आहे.

- चौकट (फोटो : २३केआरडी०५)

पुराच्या पाण्यात पिके वाहून गेली

कुंभारगाव विभागात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ओढ्याला आलेल्या पुरामुळे तळमावले ते गलमेवाडी मार्गावरील मान्याचीवाडी येथील पूल पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर पातळी नावाच्या ओढ्याला आलेले पुराचे पाणी शेतात घुसल्याने शिवार जलमय होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पिके वाहून गेली असून, शिवाजी माने, राजेंद्र माने, संजय माने, शंकर माने, बाबासाहेब माने, तानाजी कुसळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.