शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंबेदरेच्या वाड्या-वस्त्या बिबट्याच्या दहशतीखाली

By admin | Updated: December 29, 2014 00:02 IST

ग्रामस्थ भयभीत : रात्री शेतात जाणे बनले अशक्य

सातारा : अंबेदरे येथील जाधववाडी येथे मध्यवस्तीत रात्रीच्या वेळी प्रल्हाद मोरे यांच्या घरात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. शेळीच्या ओरडण्याने घरातील सर्वजण जागे झाल्याने बिबट्या पसार झाला. बिबट्याने शेळीच्या मानेला चावा घेतल्याने ती जखमी झाली. येथील वाड्या-वस्त्यांवर सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सातारा शहरापासून जवळच असलेल्या अंबेदरे परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. डोंगरात म्हशी, गाई, शेळ्या चारावयास गेलेल्या ग्रामस्थांना नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असते. डोंगरात चरावयास सोडलेल्या शेळ्या ग्रामस्थांच्या जवळून बिबट्या घेऊन जात असल्याने अनेकांनी शेळ्या चरावयास सोडणे बंद केले आहे. गेल्या आठवडाभरापासून धनवडेवाडी, जाधववाडी व भोसलेवाडी या डोंगराशेजारी असलेल्या वाड्यांच्या आसपास रात्रीच्या वेळी बिबट्या येत असल्याची चर्चा असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास जाधववाडी येथे मध्यवस्तीत प्रल्हाद मोरे यांच्या घरात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. शेळीच्या आवाजाने घरातील सर्वजण एकदम जागे झाल्याने बिबट्या शेळीला सोडून पसार झाला. आठवड्यापूर्वीच भोसलेवाडी येथेही बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार मारले. या घटनांनंतर वनपाल सुनील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावाला भेट दिली. सध्या परिसरात ज्वारीचे पीक चांगले असल्याने रानडुकरांपासून ज्वारीचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी शेतात रात्रीच्या वेळी मुक्काम करू लागले होते. पण, बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांनी रानात जाणे बंद केले असून, रानडुकरे आणि बिबट्या अशा दुहेरी दहशतीखाली ग्रामस्थ आहेत. यवतेश्वरपासून सारखळ, गवडीपर्यंतचा परिसर बिबट्याचे वावरक्षेत्र असून, अंबेदरे परिसरात अनेकदा बिबट्या ठाण मांडून बसलेला असतो. ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर बिबट्याने अनेकदा हल्लेही केले असून, अनेक शेळ््या मरण पावल्या आहेत. बिबट्याने जनावर मारल्यास नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुटसुटीत, जलद असावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)संघर्ष उंबरठ्यावर...वन्यजीव या परिसरापासून नेहमीच जवळ राहिले आहेत; परंतु बिबट्या व रानडुकरांनी अनुक्रमे जनावरे व पिके फस्त करण्यास सुरुवात केल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उंबरठ्याशी येऊन ठेपला आहे. तो टाळण्याचे आव्हान वनखात्यासमोर आहे.