शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंबेदरेच्या वाड्या-वस्त्या बिबट्याच्या दहशतीखाली

By admin | Updated: December 29, 2014 00:02 IST

ग्रामस्थ भयभीत : रात्री शेतात जाणे बनले अशक्य

सातारा : अंबेदरे येथील जाधववाडी येथे मध्यवस्तीत रात्रीच्या वेळी प्रल्हाद मोरे यांच्या घरात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. शेळीच्या ओरडण्याने घरातील सर्वजण जागे झाल्याने बिबट्या पसार झाला. बिबट्याने शेळीच्या मानेला चावा घेतल्याने ती जखमी झाली. येथील वाड्या-वस्त्यांवर सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सातारा शहरापासून जवळच असलेल्या अंबेदरे परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. डोंगरात म्हशी, गाई, शेळ्या चारावयास गेलेल्या ग्रामस्थांना नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असते. डोंगरात चरावयास सोडलेल्या शेळ्या ग्रामस्थांच्या जवळून बिबट्या घेऊन जात असल्याने अनेकांनी शेळ्या चरावयास सोडणे बंद केले आहे. गेल्या आठवडाभरापासून धनवडेवाडी, जाधववाडी व भोसलेवाडी या डोंगराशेजारी असलेल्या वाड्यांच्या आसपास रात्रीच्या वेळी बिबट्या येत असल्याची चर्चा असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास जाधववाडी येथे मध्यवस्तीत प्रल्हाद मोरे यांच्या घरात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. शेळीच्या आवाजाने घरातील सर्वजण एकदम जागे झाल्याने बिबट्या शेळीला सोडून पसार झाला. आठवड्यापूर्वीच भोसलेवाडी येथेही बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार मारले. या घटनांनंतर वनपाल सुनील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावाला भेट दिली. सध्या परिसरात ज्वारीचे पीक चांगले असल्याने रानडुकरांपासून ज्वारीचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी शेतात रात्रीच्या वेळी मुक्काम करू लागले होते. पण, बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांनी रानात जाणे बंद केले असून, रानडुकरे आणि बिबट्या अशा दुहेरी दहशतीखाली ग्रामस्थ आहेत. यवतेश्वरपासून सारखळ, गवडीपर्यंतचा परिसर बिबट्याचे वावरक्षेत्र असून, अंबेदरे परिसरात अनेकदा बिबट्या ठाण मांडून बसलेला असतो. ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर बिबट्याने अनेकदा हल्लेही केले असून, अनेक शेळ््या मरण पावल्या आहेत. बिबट्याने जनावर मारल्यास नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुटसुटीत, जलद असावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)संघर्ष उंबरठ्यावर...वन्यजीव या परिसरापासून नेहमीच जवळ राहिले आहेत; परंतु बिबट्या व रानडुकरांनी अनुक्रमे जनावरे व पिके फस्त करण्यास सुरुवात केल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उंबरठ्याशी येऊन ठेपला आहे. तो टाळण्याचे आव्हान वनखात्यासमोर आहे.