शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘पुतण्या’च्या वाढदिवसानं ‘काका’ अस्वस्थ !

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

भर कार्यक्रमात कानपिचक्या : म्हणे... फ्लेक्स लाऊन कुणी पुढारी होत नाही !--घडतंय बिघडतयं

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड राज्यात अनेक पुतण्यांनी आपल्या काकांविरोधात अडचणी उभ्या केल्याच्या घटना आहेत. राज ठाकरे, धनंजय मुंडे यांनी तर घुसमट होत होती म्हणून काकांविरोधात बंडच पुकारले होते. अजितदादांमुळे पवार साहेबांनाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. असचं काहीसं कऱ्हाड दक्षिणेत सध्या सुरू आहे. एका पुतण्याचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाल्यापासून ‘काका’ भलतेच अस्वस्थ झाले आहेत. त्यावर ‘फ्लेक्स’ लावून पुढारी होता येत नाही, अशा कानपिचक्या जाहिरपणे काकांनी पुतण्याला दिल्या खऱ्या; पण त्या पुतण्याला किती रूचत्यात, हे येणारा काळच ठरविल.गत आठवड्यात उंडाळे खोऱ्यात फटाके फुटले. मग तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष, दिवाळी तर होती ! पण विशेष आहे. कारण ते फटाके दिवाळीत फुटले असले, तरी वाढदिवसासाठी वाजविले गेले होते. अन् तो वाढदिवस होता ‘राजा’भाऊंचा! आता हे राजाभाऊ कोण तर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य. उंडाळे शिक्षण संस्थेचे संचालक अ‍ॅड. आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ ! ‘रयत’ साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांचे ते चिरंजीव तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे ते पुतणे होत. अलिकडच्या काळात राजकीय व्यक्तिंचे वाढदिवस उत्साहात करण्याची प्रथा रूढ झाली आहे; पण उंडाळकर मात्र त्याला तसे अपवाद होते. आजवर या परिवारात तालुकावार फ्लेक्स लावून कोणाचा वाढदिवस साजरा झाला नव्हता. पण राजाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी यंदा तसा बेत आखला अन् जंगी कार्यक्रम झाला. राजाभाऊंना वडिलांनी आशिर्वाद दिला. पत्नी गितांजली यांनी औक्षण केले अन् शेकडो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, काका व चुलत भावांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. याउलट विलासराव पाटीलांनी घेतलेल्या ग्रामसभेला बंधू जयसिंगराव पाटील व पुतणे राजाभाऊ गैरहजर होते. तेथे काकांनी फ्लेक्सबोर्ड लावून अन् पेपरला बातम्या छापून आणून पुढारी होता येत नाही. त्यासाठी खस्ता खाव्या लागतात, अशा कानपिचक्या पुतण्याला दिल्या. तर कोणत्या झाडाखाली बसायचं हे तुम्हीच ठरवा, असे ग्रामस्ंथांना आवाहन केले. तर अ‍ॅड. उदय पाटील मित्रमंडळाने आयोजित केलेल्या प्रीतिभोजनाच्या कार्यक्रमातही उदयसिंहांनी आपणच राजकीय पटलावरचे ‘दादा’ असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे उंडाळे परिसरातच नव्हे तर कऱ्हाड दक्षिणमध्ये सध्या राजकीय चर्चांना ऊत आला आहे.काही उंडाळकर समर्थक म्हणताहेत, आमच्या गटात काही मतभेद नाहीतच. काहीजण म्हणताहेत, हा किरकोळ विषय काका चुटकीसरशी मिटवून टाकणार. तर काहीजण म्हणताहेत, आता या दोन भावांच्यात दरी पडलीच. त्यामुळे हे बंड आता थंड होणार नाही. पुतण्याच्या वाढदिवसानंतर उंडाळकर पितापुत्रांनी अप्रत्यक्षपणे मात्र जाहीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्यकर्त्यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. जयसिंगराव पाटील बापू व अ‍ॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ मात्र ‘ब्र’ शब्द काढायला तयार नाहीत. त्यांचे हे मौन किंवा त्यांनी बाळगलेली शांतता ही वादळापूर्वीची की ‘पेल्यातल वादळ पेल्यात विरघळल्याची’, हे मात्र समजायला मार्ग नाही ! ...म्हणे, हे लागलंय जिव्हारी !घरोघरी मातीच्या चुली म्हणतात. राजकारण्यांची घरेही त्याला अपवाद नाहीत. पण इतिहासात प्रथमच उंडाळेची ग्रामपंचायत निवडणूक अ‍ॅड. उदयसिंह पाटील मित्रमंडळाने लावली अन् नऊपैकी तीन जागाही घेतल्या. यात कोण हरलं, कोण जिंकलं यापेक्षा ही निवडणुकच लागली ही बाबच जयसिंगराव पाटील व अ‍ॅड. आनंदराव पाटील यांना जिव्हारी लागल्याचे बोलले जाते.अन् हीच बाब खटकली!अ‍ॅड. आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसाला माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर व अ‍ॅड. उदयसिंह पाटील जरी गेले नसले, तरी उंडाळकरांच्या ताब्यात असणाऱ्या सर्व संस्थांचे बहुतांशी पदाधिकारी त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते. पण वाढदिवसाचा केक कापायला ‘कृष्णे’चे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होत,े ही बाब उंडाळकर पितापुत्रांना खटकल्याचे बोलले जातेय.