शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

उदयनराजेंनी फडकावला ‘लोकमत’चा अंक

By admin | Updated: August 27, 2014 23:28 IST

गोडोली पूर : मंत्र्यांशी चर्चा; ओढे संकुचित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सातारा - गोडोली परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरस्थिती मानवनिर्मित आहे का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि वने, पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री पतंगराव कदम यांना समक्ष भेटून निवेदनाव्दारे केली आहे. पुराची भीषणता दाखविण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी ‘लोकमत’चा अंक दाखवला.सातारा जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडला. ढगफुटीमुळे कोट्यवधींचे वित्तीय नुकसान नागरिक व व्यावसायिकांचे झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत शासनाकडून मिळावी, सातारा शहरातील विशेष करून गोडोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. दि. २० आॅगस्ट रोजी दीड तासात सुमारे ८२ मिलीमीटर इतका मोठ्या पावसाची नोंद झाली. तर दि. २१ आॅगस्ट रोजी ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या ढगफुटीमुळे सातारकरांचे अतोनात नुकसान झाले. कुणाचे कौटुंबिक साहित्य वाहून गेले. घरे व घरांच्या भिंतींची पडझड झाली, कुणाच्या वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने कायमस्वरूपी नादुरुस्त झाली आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या गोडोली परिसरातील ओढ्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणे करून ओढ्यांची नैसर्गिक रुंदी कमी केल्याने आणि नैसर्गिक स्त्रोत कृत्रिमरीत्या लहान व्यासाच्या पाईपलाइन टाकून बंदिस्त केले गेल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.पूरपरिस्थितीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. याप्रकरणी नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत आपत्ती निवारणाखाली देण्यात यावी. सातारा शहरातील विशेष करून गोडोली परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरपरिस्थिती मानवनिर्मित आहे कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. (प्रतिनिधी)‘लोकमत’चा आधारगोडोली येथे घडलेल्या महापुराच्या प्रकाराविषयी ‘लोकमत’ने सविस्तर वार्तांकन केले होते. ‘लोकमत’मध्ये आलेल्या या वृत्ताचे अंक घेवून उदयनराजे यांनी मंत्री पंतगराव कदम आणि बाळासाहेब थोरात यांना वास्तव दाखविले. यावेळी विलास आंबेकर व सागर राजेमहाडिक उपस्थित होते.मुंबई येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व वनमंत्री पतंगराव कदम यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना खा. उदयनराजे भोसले. यावेळी सागर राजेमहाडिक, मंत्री बाळासाहेब थोरात व विलास आंबेकर उपस्थित होते. पुराची भीषणता दाखविण्यासाठी यावेळी ‘लोकमत’चा अंक दाखवला गेला.