शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 17:25 IST

सातारा : ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांनी पवार साहेबांच्यासोबत प्रवास केला,’ अशी खिल्ली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उडविली. सुरुची ...

ठळक मुद्देशिवेंद्रसिंहराजेंकडून उदयनराजेंची उडविली खिल्ली गुण उधळले त्याचे पाप भोगा; दुसºयाकडे कशाला बोटे दाखवता?उदयनराजेंना मी पणाचा ‘व्हायरस’ जडला: शिवेंद्रसिंहराजेंची टीका

सातारा : ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांनी पवार साहेबांच्यासोबत प्रवास केला,’ अशी खिल्ली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उडविली. सुरुची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उदयनराजेंना मी पणाचा ‘व्हायरस’ जडला आहे. मला अडकविण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे, असं ते म्हणतात. आपण जे गुण उधळतो, पराक्रम करतो, त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ते स्वत:ला मोठा नेता समजतात, मग त्यांनी असं बोलणं बरं दिसत नाही. दुसºयाकडे बोटे दाखवून आपण केलेले पाप झाकून जाणार आहे का?, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केली. 

‘मी वरच्या लेवलचे राजकारण करतो, बाकीचे राजकारणी आपल्यासोबत किरकोळ आहेत, असं उदयनराजे कायम सांगत असतात. हो तेही बरोबरच आहे, ते तंद्रीतून उतरले तर त्यांना पृथ्वीवर आल्याचा आभास होईल. समोरासमोर या, असं वारंवार ते आव्हान देतात. आम्ही चार वेळा समोरा-समोर आलो, काही दिवसांपूर्वी त्यांनी रात्रीची शहरात शिवार फेरी काढली होती. तेव्हाही मी त्यांच्या समोर गेलो होतो. पुण्यात प्रदूषणाचा त्रास झाला म्हणून आम्ही काय साताºयात हवा बदलायला येत नाही,’ अशा शब्दांतही शिवेंद्रसिंहराजेंनी खरपूस समाचार घेतला.

जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, कर्जमाफी, सिंचनाचे प्रश्न, मेडिकल कॉलेज आदी प्रश्नांबाबत खासदारांना गांभीर्य नाही, पण मात्र त्यांना टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलण्याचा प्रश्न मोठा वाटतो. कलेक्टरसोबत खास बैठक घेऊन स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नाची ढाल केली गेली. नवीन व्यवस्थापनाने स्थानिकांना बेरोजगार करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांना या टोलनाक्याच्या प्रश्नात एवढा रस का आहे?, असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला. 

कास धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मार्गी लावला. विदर्भाच्या अनुशेषामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रकल्प घेता येणार नव्हता. माझ्या पत्रावर अजित पवारांनी मंत्रालयात बैठक लावली होती. सातारा शहर व आजूबाजूच्या १५ गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी हा प्रकल्प होणार असल्याने तो पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे येत्या दिवाळीत या कामाची सुरुवात होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत पंचायत समितीने विरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? या प्रश्नावर शहराची हद्दवाढ झाली तर त्रिशंकू भागासह हद्दवाढीत येणाºया ग्रामपंचायतींचा फायदाच होणार आहे, पण स्थानिक जनतेची तशी मागणी असल्याने लोकप्रतिनिधींही जनतेची भावना मांडली आहे, असे ते म्हणाले. ‘फास्ट’ पळून शेवटी पवार साहेबांकडेच यावे लागलेउदयनराजेंना ‘फास्ट’ गाडी चालविण्याची सवय आहे. राजकारणातही ते खूप पळत सुटले. मात्र, पळून-पळून त्यांना शेवटी पवार साहेबांकडेच यावे लागले. हे कालच्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे, अशी कोपरखळी शिवेंद्रसिंहराजेंनी मारली.नगराध्यक्षांना अधिकार वापरू द्या की...नगराध्यक्षा सामान्य घरातील आहेत, मात्र आईसाहेब पालिकेत जाऊन ढवळाढवळ करत आहेत. नगराध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरू द्या की, ते हिरावून का घेताय?, असा सवालही शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला.