शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 17:25 IST

सातारा : ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांनी पवार साहेबांच्यासोबत प्रवास केला,’ अशी खिल्ली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उडविली. सुरुची ...

ठळक मुद्देशिवेंद्रसिंहराजेंकडून उदयनराजेंची उडविली खिल्ली गुण उधळले त्याचे पाप भोगा; दुसºयाकडे कशाला बोटे दाखवता?उदयनराजेंना मी पणाचा ‘व्हायरस’ जडला: शिवेंद्रसिंहराजेंची टीका

सातारा : ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांनी पवार साहेबांच्यासोबत प्रवास केला,’ अशी खिल्ली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उडविली. सुरुची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उदयनराजेंना मी पणाचा ‘व्हायरस’ जडला आहे. मला अडकविण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे, असं ते म्हणतात. आपण जे गुण उधळतो, पराक्रम करतो, त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ते स्वत:ला मोठा नेता समजतात, मग त्यांनी असं बोलणं बरं दिसत नाही. दुसºयाकडे बोटे दाखवून आपण केलेले पाप झाकून जाणार आहे का?, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केली. 

‘मी वरच्या लेवलचे राजकारण करतो, बाकीचे राजकारणी आपल्यासोबत किरकोळ आहेत, असं उदयनराजे कायम सांगत असतात. हो तेही बरोबरच आहे, ते तंद्रीतून उतरले तर त्यांना पृथ्वीवर आल्याचा आभास होईल. समोरासमोर या, असं वारंवार ते आव्हान देतात. आम्ही चार वेळा समोरा-समोर आलो, काही दिवसांपूर्वी त्यांनी रात्रीची शहरात शिवार फेरी काढली होती. तेव्हाही मी त्यांच्या समोर गेलो होतो. पुण्यात प्रदूषणाचा त्रास झाला म्हणून आम्ही काय साताºयात हवा बदलायला येत नाही,’ अशा शब्दांतही शिवेंद्रसिंहराजेंनी खरपूस समाचार घेतला.

जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, कर्जमाफी, सिंचनाचे प्रश्न, मेडिकल कॉलेज आदी प्रश्नांबाबत खासदारांना गांभीर्य नाही, पण मात्र त्यांना टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलण्याचा प्रश्न मोठा वाटतो. कलेक्टरसोबत खास बैठक घेऊन स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नाची ढाल केली गेली. नवीन व्यवस्थापनाने स्थानिकांना बेरोजगार करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांना या टोलनाक्याच्या प्रश्नात एवढा रस का आहे?, असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला. 

कास धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मार्गी लावला. विदर्भाच्या अनुशेषामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रकल्प घेता येणार नव्हता. माझ्या पत्रावर अजित पवारांनी मंत्रालयात बैठक लावली होती. सातारा शहर व आजूबाजूच्या १५ गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी हा प्रकल्प होणार असल्याने तो पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे येत्या दिवाळीत या कामाची सुरुवात होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत पंचायत समितीने विरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? या प्रश्नावर शहराची हद्दवाढ झाली तर त्रिशंकू भागासह हद्दवाढीत येणाºया ग्रामपंचायतींचा फायदाच होणार आहे, पण स्थानिक जनतेची तशी मागणी असल्याने लोकप्रतिनिधींही जनतेची भावना मांडली आहे, असे ते म्हणाले. ‘फास्ट’ पळून शेवटी पवार साहेबांकडेच यावे लागलेउदयनराजेंना ‘फास्ट’ गाडी चालविण्याची सवय आहे. राजकारणातही ते खूप पळत सुटले. मात्र, पळून-पळून त्यांना शेवटी पवार साहेबांकडेच यावे लागले. हे कालच्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे, अशी कोपरखळी शिवेंद्रसिंहराजेंनी मारली.नगराध्यक्षांना अधिकार वापरू द्या की...नगराध्यक्षा सामान्य घरातील आहेत, मात्र आईसाहेब पालिकेत जाऊन ढवळाढवळ करत आहेत. नगराध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरू द्या की, ते हिरावून का घेताय?, असा सवालही शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला.