शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

ब्रिटिशकालीन वटवृक्षांना केमिकल डोस वाईतील अघोरी प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:42 IST

वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग

ठळक मुद्दे: ओल्या झाडांना आग लावण्याच्या घटनांमध्ये वाढ

पांडुरंग भिलारे।वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग लावली जात आहे. या आगीत हिरवेगार वृक्ष होरपळत असून, त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वाई-पाचवड रस्त्यावर एका भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या बुंध्यात विघ्नसंतोषींकडून आग लावण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वाई पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण आणले. सध्या वाई-पाचवड मार्गावर असलेल्या वटवृक्षांना आग लावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे जुन्या झाडांचे अस्तित्व धोक्यात आलेआहे.विघ्नसंतोषींकडून हे वटवृक्ष पाडण्यासाठी झाडाच्या बुंध्यात केमिकल ओतले जात आहे. यानंतर झाडाला आग लावली जात आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक घटना वाई-पाचवड मार्गावर घडल्या असून, आगीत हिरवेगार वृक्ष जळून खाक झाले आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी पर्यावरण संरक्षणाचा कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.तर समाजाला नवी दिशावन विभागाचे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरविण्याची आवश्यकता आहे.तसेच बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरणात झाडे हटविण्यापेक्षा ती स्थलांतरित करून नव्याने लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून समाजाला एक दिशा मिळून अशा प्रकारांना आळा बसेल, असे मत नागरिकांमधून होत आहे.