शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

दोन वर्षांपासून लाखोंचा भविष्यनिर्वाह निधी रखडला

By admin | Updated: September 23, 2016 00:44 IST

आंदोलनाचा इशारा : आनेवाडी टोलनाक्यावरील माजी कर्मचारी हवालदिल

भुर्इंज : आनेवाडी टोलनाक्यावर काम करत असणाऱ्या ८० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यानंतर गेली दोन वर्षे त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमच त्यांना देण्यात आली नाही. याबाबत वारंवार हेलपाटे घालून वैतागलेले हे कर्मचारी आता पुरते हवालदिल झाले असून, सर्वांचा मिळून असणारा लाखो रुपयांचा निधी दसऱ्यापर्यंत न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना किरण जाधव म्हणाले, ‘टोलनाक्यावर काम करणाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांना काम करतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि आता राजीनामा घेतल्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. काम करत असताना पगाराच्या पावत्या न देणे, मन मानेल त्या पद्धतीने कामगारांना वागणूक देणे, विनाकारण पगार कपात करणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, घरापासून जवळ काम आहे म्हणून अनेकांनी त्याही परिस्थितीत काम केले. अनेकांना प्रदूषणाचा गंभीर त्रास सहन करावा लागला. टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलले की कायदा बदलतो त्याचाही फटका कामगारांना प्रत्येकवेळी बसत आला आहे. या सर्व कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम लाखो रुपये असून, यातील ९५ टक्के कामगार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आनेवाडी टोलनाक्यावर काम केलेल्या कामगारांवर हा प्रचंड मोठा अन्याय होत आहे. गेली अनेक महिने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे हे संबंधित सर्वच कर्मचारी एकत्रितपणे याबाबत लवकरच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे तक्रार करणार आहेत. कारण आता त्यांच्याकडूनच आम्हाला खऱ्या अर्थाने न्यायाची अपेक्षा करावी लागेल, असेही जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)८० जणांवर संक्रांत : कामगार झालेत हताशअनेक कामगारांना कोणतेही कारण न देता घरी घालवण्यात आले आहे. त्यामुळे वैतागून अनेकांनी भविष्य निर्वाह निधी मिळेल म्हणून राजीनामा दिला आहे. मात्र, ८० हून अधिक कामगारांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. ठराविक जणांना ठराविक कारणाची पूर्तता केल्यानंतर ही रक्कम दिली असून, काम नसल्यामुळे बेकार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे कोणत्याही अपेक्षेविना दिले पाहिजेत.