शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

दोन वर्षांपासून लाखोंचा भविष्यनिर्वाह निधी रखडला

By admin | Updated: September 23, 2016 00:44 IST

आंदोलनाचा इशारा : आनेवाडी टोलनाक्यावरील माजी कर्मचारी हवालदिल

भुर्इंज : आनेवाडी टोलनाक्यावर काम करत असणाऱ्या ८० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यानंतर गेली दोन वर्षे त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमच त्यांना देण्यात आली नाही. याबाबत वारंवार हेलपाटे घालून वैतागलेले हे कर्मचारी आता पुरते हवालदिल झाले असून, सर्वांचा मिळून असणारा लाखो रुपयांचा निधी दसऱ्यापर्यंत न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना किरण जाधव म्हणाले, ‘टोलनाक्यावर काम करणाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांना काम करतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि आता राजीनामा घेतल्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. काम करत असताना पगाराच्या पावत्या न देणे, मन मानेल त्या पद्धतीने कामगारांना वागणूक देणे, विनाकारण पगार कपात करणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, घरापासून जवळ काम आहे म्हणून अनेकांनी त्याही परिस्थितीत काम केले. अनेकांना प्रदूषणाचा गंभीर त्रास सहन करावा लागला. टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलले की कायदा बदलतो त्याचाही फटका कामगारांना प्रत्येकवेळी बसत आला आहे. या सर्व कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम लाखो रुपये असून, यातील ९५ टक्के कामगार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आनेवाडी टोलनाक्यावर काम केलेल्या कामगारांवर हा प्रचंड मोठा अन्याय होत आहे. गेली अनेक महिने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे हे संबंधित सर्वच कर्मचारी एकत्रितपणे याबाबत लवकरच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे तक्रार करणार आहेत. कारण आता त्यांच्याकडूनच आम्हाला खऱ्या अर्थाने न्यायाची अपेक्षा करावी लागेल, असेही जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)८० जणांवर संक्रांत : कामगार झालेत हताशअनेक कामगारांना कोणतेही कारण न देता घरी घालवण्यात आले आहे. त्यामुळे वैतागून अनेकांनी भविष्य निर्वाह निधी मिळेल म्हणून राजीनामा दिला आहे. मात्र, ८० हून अधिक कामगारांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. ठराविक जणांना ठराविक कारणाची पूर्तता केल्यानंतर ही रक्कम दिली असून, काम नसल्यामुळे बेकार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे कोणत्याही अपेक्षेविना दिले पाहिजेत.