शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुचाकी सुसाट; चारचाकीला ‘नो एण्ट्री’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

साताऱ्यासह कोकणातून येणारी वाहने कोयना नदीवरील नव्या पुलावरून कऱ्हाडात प्रवेश करतात. नदीवर त्यासाठी चौपदरी मोठा पूल आहे. मात्र, दैत्यनिवारणी ...

साताऱ्यासह कोकणातून येणारी वाहने कोयना नदीवरील नव्या पुलावरून कऱ्हाडात प्रवेश करतात. नदीवर त्यासाठी चौपदरी मोठा पूल आहे. मात्र, दैत्यनिवारणी मंदिरानजीक ब्रिटिशकालीन लोखंडी पूल असून, या पुलावरून केवळ दुचाकीची वाहतूक होते. पूल कमकुवत झाल्यामुळे पुलावरील चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच पुलाच्या दोन बाजूस खांब उभारण्यात आले. या खांबांमधून वाट काढीत केवळ दुचाकी व पादचारीच या पुलावरून ये-जा करतात. काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाच्या मजबुतीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यातून मजबुतीकरणाचे कामही करण्यात आले. या कामानंतर येथून चारचाकी वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतरही पूल चारचाकीसाठी बंदच होता. जानेवारी २०२१ मध्ये पुन्हा या पुलाचा सर्व्हे करण्यात आला. चारचाकी वाहतुकीसाठी पूल सुरक्षित आहे का, याची खातरजमा करण्यात आली. वाळूने भरलेले डंपर पुलावरून नेण्यात आले. तसेच सकाळी, दुपारी आणि रात्री उशिरा तापमानाचा पुलावर होणारा परिणामही तपासण्यात आला. सर्व चाचण्या पार पडल्यानंतर पूल हलक्या वाहनांसाठी खुला करता येऊ शकतो, असे निष्पन्न झाले.

माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यावेळी पुलाची पाहणी केली. पूल हलक्या चारचाकी वाहनांसाठी आठवड्यात खुला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अद्यापही पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही. पुलाचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे.

- चौकट

चारचाकी वाहतुकीत अडथळे

१) पुलाची रुंदी कमी असल्याने अपघाताचा धोका

२) दोन्ही बाजूस रस्त्याची झालेली दुरवस्था

३) दैत्यनिवारणी मंदिरानजीक खचलेला रस्ता

४) पुलापासून वारूंजी फाट्यापर्यंतचे अतिक्रमण

५) रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते

- चौकट

झोपडपट्टी अद्याप जैसे थे

जुन्या पुलाच्या पूर्व बाजूला दैत्यनिवारणी मंदिरानजीक रस्त्यालगतच झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीचा प्रश्नही अद्याप जैसे थे आहे. चारचाकी वाहतूक सुरू करण्यापूर्वी झोपडपट्टीच्या सुरक्षेचा विषय बांधकाम विभागाला मिटवावा लागेल. झोपडपट्टीसमोर संरक्षक रेलिंग अथवा कठडे उभारणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबत कसलीच कार्यवाही अद्याप झालेली नाही.

- चौकट

उंचीरोधक उभारण्याची गडबड

पुलाच्या दोन्ही बाजूस बांधकाम विभागाने उंचीरोधक खांब उभारले आहेत. रस्त्यासह इतर प्रश्न अद्याप मिटलेले नसताना उंचीरोधक उभारण्याची गडबड कशासाठी, हा प्रश्न आहे.

- चौकट

हलकी वाहतूक सुरू झाल्यास...

१) कोल्हापूर नाक्यावरील ताण कमी होणार

२) कोल्हापूर नाक्यापासून दत्त चौकापर्यंतची कोंडी कमी

३) पुणे, सातारा, पाटणकडून येणारी वाहने जुन्या पुलावरून कऱ्हाडात येणार

४) दैत्यनिवारणी मंदिरापासून शाहू चौक रस्त्याला वर्दळ वाढणार

५) बाजारपेठ विस्ताराला वाव मिळणार

फोटो : २६केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडात कोयना नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावर हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी उंचीरोधक खांब उभारण्यात आले आहेत.