शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोयनेत दोन टीएमसीने वाढ

By admin | Updated: July 4, 2016 00:12 IST

जिल्ह्यात संततधार कायम : वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटणमध्ये पावसाचा जोर

सातारा / महाबळेश्वर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत धरणात तब्बल २.१४ टीएमसीने पाण्यात वाढ झाली आहे. कोयना येथे शनिवारी १५६, नवजा येथे १९६, तर महाबळेश्वरमध्ये १६४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. अवघ्या चोवीस तासांत २.१४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या १६.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सातारा शहरातही शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. आठवड्याची सुटी असूनही रविवारच्या आठवड्या बाजारात तसेच मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. सायंकाळी सहानंतर काहीकाळ पावसाने विश्रांती घेतली. महाबळेश्वर : तालुक्यात रविवारी पावसाचा जोर वाढला असून, मुसळधार पाऊस सुरूच आहे. शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याने सकाळपासून पर्यटकांनी महाबळेश्वर गजबजून गेले होते. बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत होती. वेण्णा लेकवर मुसळधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटत होते. काही पर्यटक भर पावसात नौकाविहार करण्यात मग्न होते. संततधार पावसाने वेण्णा लेकच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. महाबळेश्वरमध्ये या हंगामात आतापर्यंत ९१७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या चोवीस तासांमध्ये तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : सातारा २८.२, जावळी ५५.३, कऱ्हाड १७.३, कोरेगाव २०.१, खटाव १४.८, माण ५.१, फलटण १.२, खंडाळा २५.१, वाई २९.३, महाबळेश्वर १५५.१ मिली. (प्रतिनिधी) दरड कोसळण्याचे सत्र सुरूच पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील दरड कोसळण्याचे सत्र शनिवारपासून सुरूच आहे. या घाटात पुन्हा रविवारी सकाळी दरड कोसळली. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. एसटी कर्मचारी व प्रवाशांनी दरड हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली. सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात रविवारी सकाळी दरड कोसळली. एसटी कर्मचारी व प्रवाशांनी ती हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली.