शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

बंधाऱ्यांतून निघणार दोन हजार ट्रॉली गाळ...

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

कातरखटाव : लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान; सावली फाउंडेशनचा पुढाकार

विठ्ठल नलवडे -- कातरखटाव  तालुक्यातील कातरखटाव येथे ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. लोकसहभागातून व सावली फाउंडेशनच्या पुढाकारातून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, ओढ्यातील गाळ काढण्याबरोबर विहीर पुनर्भरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, येथील तीन बंधाऱ्यांतून सुमारे दोन हजार ट्रॉली गाळ निघणार आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढीस मोठी मदत होणार आहे. सध्या कातरखटाव गावाजवळ असणाऱ्या एका बंधाऱ्यातून गाळ काढण्यात येत आहे. तसेच बंधाऱ्याची गळती काढून उंची दोन फू ट वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा तसेच येत्या पावसाळ्यात पाणी मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे. तसेच इतर दोन बंधाऱ्यातीलही लवकरच गाळ काढण्यात येणार आहे या ‘जलयुक्त शिवार’अभियान कार्यक्रमाच्या वेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, खटावचे तहसीलदार विवेक सांळुखे, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी बी. एच. दाभाडे, कृषी सहायक यू. एन. चिकुटे, सरपंच तानाजीशेठ बागल, उपसरपंच संतोष बागल, ग्रामसेवक आर. व्ही. अहिरेकर, डॉ. आकाराम बोडके, प्रशांत पाटील, अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अजित सिहांसने, पोपट बागल, जयकुमार बागल व ग्रामस्थ उपस्थित होते. ‘पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व जलयुक्त शिवार कामामध्ये गावातील सर्व लोकांचा सहभाग दिसून आला पाहिजे, असे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले.शेतकऱ्यांकडून गाळाची वाहतूक...कातरखटावची ‘जलयुक्त शिवार’ अभियानअंतर्गत निवड करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच येथील एका बंधाऱ्याचे आठ दिवस काम चालणार आहे. सध्या दिवसाला शंभर ट्रॉली गाळ उचलला जात असून, आठ दिवसांत हजार ते बाराशे ट्रॉली गाळ निघणार आहे. येथील सर्व तीन बंधाऱ्यांतून सुमारे दोन हजार ट्रॉलींच्यावर गाळ निघणार आहे. सध्या येथील गाळ शेतकरी घेऊन जात आहेत. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढणार आहे.