शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

दोन हजारांचा वापर बिले मात्र अडीचशे

By admin | Updated: December 3, 2015 23:52 IST

वीजवितरणचा कारभार : दोन महिन्यांपासून मीटरचे फोटो गायब

सातारा : कोणत्याही शासकीय यंत्रणेचे खासगीकरण झाल्यानंतर काय होऊ शकते, याचा प्रत्येय सध्या जिल्ह्यातील वीजग्राहक घेऊ लागले आहेत. जिल्ह्यातील काही भागात अतिशय कमी वापर झालेला असताना २५ ते ३० हजारांपर्यंत वीजबिल आकारण्याची करामत केली आहे. सातारा परिसरातील काही भागातील ग्राहकांना मात्र भलताच अनुभव येऊ लागला आहे. दरवेळचे सरासरी वापर हजार दोन हजार असताना केवळ दोन ते चार रुपयांची बिले दिली आहेत. बिलावरून मीटर युनिट रिडिंगचा फोटोही गायब झाला आहे.वीज बिलातील घोटाळे हे नवीन नाहीत. अनेक भागांत प्रमाणापेक्षा जास्त बिल येत असल्याची तक्रारी ग्राहकांतून येत आहेत. बिल जास्त आले म्हणून ते लवकर भरत नाहीत. बिल भरले नाही म्हणून जोडणी कट केली जाते. त्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर होतो. एकदा आलेले बिल कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. ते त्यांच्या अधिकारात कमी करून देतात; मात्र उर्वरित रक्कम पुढच्या बिलात आकारली जाते. या सर्व तक्रारींचा विचार करून वीजवितरण कंपनीने काही वर्षांपूर्वी पथदर्शी उपक्रम राबविला होता. कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर मीटर युनिट रिडिंग, बिलांचे वाटप यासाठी ठेकेदार नेमले आहेत. रिडिंग घेताना मीटरचे फोटो घेऊन येतील. रिडिंग युनिटचा फोटोच बिलावर प्रसिद्ध झाल्याने तक्रारी कमी होतील व कामात सुसूत्रता येण्याची आशा निर्माण झाली होती. सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या दरे बुद्रुक परिसरातील अनेक ग्राहकांच्या बिलाचे दोन महिन्यांपासून रिडिंगच झालेले नाही. दरवेळी फोटोचा रकाना रिकामा येत आहे. त्यामुळे सरासरी बिल आकारले जात आहे. ज्यांचा दरमहिन्याचा सरासरी वापर दीड ते दोन हजार रुपये येत आहेत, त्यांना अवघे दोनशे रुपयांचे बिल दिले आहे. (प्रतिनिधी)सर्वच ग्राहकांच्या विद्युत मीटरचे फोटो रिडिंग घेणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत घर बंद असेल तर रिडिंग घेता येत नाही. तरीही यासंदर्भात अशा घटना घडल्या असल्यास तत्काळ रिडिंग घेतले जाईल. त्या आशयाच्या सूचना संबंधित विभागाला केल्या जातील.- सुरेश गणेशकर --अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, सातारासहन करावा लागणार भुर्दंडखासगी ठेका दिल्याने ग्राहक कोणालाही बोलू शकत नाहीत. विचारले असता ‘घर बंद असल्याने रिडिंग घेतले नाही’ हे कारण सांगितले जाते. मात्र, एक-दोन महिन्यांनी मागचे सर्व रिडिंगचा वापर दाखविला जाणार आहे. त्यावेळी मागील सर्व बिल एकदम भरावे लागणार आहे. बिल न भरल्यास जोडणी तोडण्यास पुढचा विभाग सज्ज आहेच.