शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

दोन वस्तींमध्ये ‘जलयुक्त’ची लक्ष्मणरेषा

By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST

बांध घातल्यामुळे दळणवळण ठप्प : बागलवस्ती, बोडके वस्तीतील ग्रामस्थ आक्रमक; सात वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा

विठ्ठल नलवडे - कातरखटाव--कातरखटाव पासून दीड किलोमीटरवर असलेल्या बागलवस्ती व बोडकेवस्तीचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ‘जलयुक्त शिवार’ अभियानअंतर्गत बागलवस्ती येथे शेतात बांध घातला असल्यामुळे दोन्ही वस्त्यांचा दळणवळणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला आहे. वाहतूक ठप्प असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कातरखटाव येथील बोडकेवस्ती व बागलवस्ती गेल्या आठ वर्षांपासून रस्त्याची मागणी करीत आहेत. वांरवार मोजणी, तहसीलदारांचा निकाल होतोय, प्रांताकडे प्रस्ताव दिला आहे, पुढच्या महिन्यात मोजणी होणार आहे, या लपंडावात या रस्त्याचे काम आजतागायत झाले नाही. सध्या बागल वस्तीवर पंचवीस घरे आहेत व बोडके वस्तीवर जवळपास पन्नास घरे आहेत. दोन्ही वस्तींची सहाशेच्या आसपास लोकसंख्या आहे. शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची काम खेडोपाडी मार्गी लावण्याचा सपाटा लावाला आहे. कातरखटाव परिसरातही ‘जलयुक्त’ची कामे जोमात सुरू आहेत.मात्र, बोडके वस्ती व बागल वस्ती जवळ एका शेतात बांध घातल्यामळे दोन्ही वस्त्यांची दळणवळणाची कोंडी झाली आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना अनेक अचडणींना सामोरे जावे लागत आहे. या बाबत प्रशासनाने लक्ष घालून बागल ग्रामस्थांची होणारी ससेहोलपट थाबंवावी, अशी मागणी होत आहे. रस्त्याविना ग्रामस्थांची परवडबोडके वस्ती व बागल वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्याविना मोठी परवड होत आहे. साधे माचीस आणायचे झाले तरी गावात गेल्याशिवाय पर्याय नाही. शालेय मुलांनाही गावात चालत पायवाटेने जावे लागते. पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत असल्याने ग्रामस्थांची चांगलीच दमछाक होते. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेताना ग्रामस्थांच्या पुढे असंख्य प्रश्न उभे राहतात. उपोषणाचा इशारारस्त्यासंदर्भात बोडके वस्ती व बागल वस्तीतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊनसुद्धा हा प्रश्न जैसे थे आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा बागल वस्तीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.