शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

दोन महिन्यांपासून ग्रामस्थांचा घसा कोरडा

By admin | Updated: February 18, 2015 23:45 IST

आवळेपठार, गारवडीत पाणीटंचाई : टॅँकर सुरू करण्याबाबत प्रशासन मात्र उदासीन

केशव जाधव - पुसेगाव   आवळेपठार, गारवडी, ता. खटाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, प्रशासन एकमेंकाकडे बोटे दाखवत टोलवाटोलवी करत आहे. पिण्याचा टँकर तत्काळ सुरू न झाल्यास या निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.गारवडी, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आवळेपठार वस्ती आहे. ही वस्ती ही खटाव-माण तालुकांच्या डोंगरावर असून, याठिकाणी सुमारे १५० ते १७५ लोकसंख्या आहे. याठिकाणी सामुदायिक विहीर आहे, जून ते डिसेंबर या कालावधीत या विहिरीत छोटी मोटार टाकून सुमारे १० ते १५ हजार लिटर क्षमतेच्या असलेल्या टाकीत पाणी साठवले जाते. येथूनच सर्व ग्रामस्थ पाणी नेत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून आवळेपठार येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा, यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांत, खटाव-माण तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली. मात्र, आवळेपठार हे खटाव हद्दीत येत असले तरी त्याला रस्ता हा माण तालुक्यातून आहे. पिण्याच्या पाण्याचा तत्काळ टँकर सुरू करून पाणी टंचाई दूर करावी, याकरिता प्रशासन कार्यालयामध्ये वेळोवेळी गेल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून टोलवाटोलवी व उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांना वेठीस धरत आहेत तसेच दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. पाणी टॅँकर सुरू न केल्यास या निष्क्रिय प्रशासनाच्या कारभारा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अधिवेशनात आवाज उठविणार : शिंदेआवळेपठार येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील महिला व ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. म्हणूनच स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला आहे. मात्र, पाणी टंचाईच्या काळातही जिल्ह्यातील प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत कामात हालगर्जीपणा करत आहे. यासंदर्भात विधानसभेच्या यार्च अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.