शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन आमदारांनी साधला तीन तालुक्यांचा बॅलन्स!

By admin | Updated: March 15, 2017 22:47 IST

पदाधिकारी निवडी : सातारा, जावळी, कोरेगाव विधानसभा मतदार संघांना संधी

सागर गुजर ल्ल साताराआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्याच्या सभापती व उपसभापतिपद निवडताना तीन तालुक्यांचा बॅलन्स साधल्याचे स्पष्ट दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना म्हणूनही या निवडीकडे पाहिले जात आहे. सातारा पंचायत समितीमध्ये २० पैकी ११ जागा जिंकून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. भारतीय जनता पक्षाला सोबत घेणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या हाती ९ जागा लागल्या. सभापती व उपसभापतिपद आमदार गटाकडेच जाणार, हे स्पष्ट होते, पण तरीही खासदार गटाने या निवडीत आपले नशीब आजमावले. आमदार गटाची मते फुटू शकली नाहीत, त्यामुळे पर्यायाने आमदार गटाकडेच सभापती व उपसभापतिपद राहिले आहे. सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये सभापतिपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटातील मिलिंद कदम तर उपसभापतिपदाची माळ जितेंद्र सावंत यांच्या गळ्यात पडली. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतर्फे खेड गणातून मिलिंद कदम यांनी दोन अर्ज दाखल केले होते. तर शेंद्रे गणातून राष्ट्रवादीच्या छाया कुंभार यांनी एक तर सातारा विकास आघाडीतून दरे खुर्द गणातील हणमंत गुरव यांनी अर्ज दाखल केले. तर उपसभापतिपदासाठी लिंब गणातून जितेंद्र सावंत यांनी राष्ट्रवादीतून दोन अर्ज दाखल केले. तर सातारा विकास आघाडीचे कोडोली गणातील रामदास साळुंखे यांनी अर्ज भरला होता. सभापतिपदासाठी दाखल केलेल्या छाया कुंभार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने मतदान घ्यावे लागले. पंचायत समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये सभापतिपदासाठी आमदार गटाचे कदम यांना अकरा तर खासदार गटाचे हणमंत गुरव यांना नऊ मते पडली. सभापतिपदावर कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मिलिंद कदम यांची निवड झाली असल्याने उपसभापतिवर सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील जितेंद्र सावंत यांची निवड केली गेली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत पाच वर्षे सदस्य असलेले जितेंद्र सावंत यांना लिंब गट आरक्षित झाल्याने पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागली होती. पंचायत समितीचे सभापतिपदही आरक्षित असल्याने सावंत यांना उपसभापतिपदावर संधी देण्यात आली. हे पद अडीच वर्षांसाठी ठेवले जाणार याची उत्सुकता आहे. सभापतिपद हे अडीच वर्षे कदम यांच्याकडेच राहणार असल्याने उपसभापतिपद बदलाचा निर्णयही अडीच वर्षांनंतरच होऊ शकतो. आमदारांकडून बेरजेचे राजकारणलिंब हे सातारा तालुक्यातील मोठे गाव आहे. राजकीयदृष्ट्या या गावाने आमदारांना साथ दिली आहे. भविष्यात हे गाव आपल्या पाठीशी राहील, या बेरजेच्या राजकारणातून लिंबच्या जितेंद्र सावंत यांना उपसभापतिपदावर संधी दिली गेली आहे.