शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

दोन आमदारांनी साधला तीन तालुक्यांचा बॅलन्स!

By admin | Updated: March 15, 2017 22:47 IST

पदाधिकारी निवडी : सातारा, जावळी, कोरेगाव विधानसभा मतदार संघांना संधी

सागर गुजर ल्ल साताराआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्याच्या सभापती व उपसभापतिपद निवडताना तीन तालुक्यांचा बॅलन्स साधल्याचे स्पष्ट दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना म्हणूनही या निवडीकडे पाहिले जात आहे. सातारा पंचायत समितीमध्ये २० पैकी ११ जागा जिंकून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. भारतीय जनता पक्षाला सोबत घेणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या हाती ९ जागा लागल्या. सभापती व उपसभापतिपद आमदार गटाकडेच जाणार, हे स्पष्ट होते, पण तरीही खासदार गटाने या निवडीत आपले नशीब आजमावले. आमदार गटाची मते फुटू शकली नाहीत, त्यामुळे पर्यायाने आमदार गटाकडेच सभापती व उपसभापतिपद राहिले आहे. सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये सभापतिपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटातील मिलिंद कदम तर उपसभापतिपदाची माळ जितेंद्र सावंत यांच्या गळ्यात पडली. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतर्फे खेड गणातून मिलिंद कदम यांनी दोन अर्ज दाखल केले होते. तर शेंद्रे गणातून राष्ट्रवादीच्या छाया कुंभार यांनी एक तर सातारा विकास आघाडीतून दरे खुर्द गणातील हणमंत गुरव यांनी अर्ज दाखल केले. तर उपसभापतिपदासाठी लिंब गणातून जितेंद्र सावंत यांनी राष्ट्रवादीतून दोन अर्ज दाखल केले. तर सातारा विकास आघाडीचे कोडोली गणातील रामदास साळुंखे यांनी अर्ज भरला होता. सभापतिपदासाठी दाखल केलेल्या छाया कुंभार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने मतदान घ्यावे लागले. पंचायत समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये सभापतिपदासाठी आमदार गटाचे कदम यांना अकरा तर खासदार गटाचे हणमंत गुरव यांना नऊ मते पडली. सभापतिपदावर कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मिलिंद कदम यांची निवड झाली असल्याने उपसभापतिवर सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील जितेंद्र सावंत यांची निवड केली गेली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत पाच वर्षे सदस्य असलेले जितेंद्र सावंत यांना लिंब गट आरक्षित झाल्याने पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागली होती. पंचायत समितीचे सभापतिपदही आरक्षित असल्याने सावंत यांना उपसभापतिपदावर संधी देण्यात आली. हे पद अडीच वर्षांसाठी ठेवले जाणार याची उत्सुकता आहे. सभापतिपद हे अडीच वर्षे कदम यांच्याकडेच राहणार असल्याने उपसभापतिपद बदलाचा निर्णयही अडीच वर्षांनंतरच होऊ शकतो. आमदारांकडून बेरजेचे राजकारणलिंब हे सातारा तालुक्यातील मोठे गाव आहे. राजकीयदृष्ट्या या गावाने आमदारांना साथ दिली आहे. भविष्यात हे गाव आपल्या पाठीशी राहील, या बेरजेच्या राजकारणातून लिंबच्या जितेंद्र सावंत यांना उपसभापतिपदावर संधी दिली गेली आहे.