शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कार-ट्रक अपघातात दोन ठार; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST

पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्यातील जोशी विहीर येथील उड्डाण पुलावर कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोनजण ...

पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्यातील जोशी विहीर येथील उड्डाण पुलावर कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले असून चारजण जखमी झाले. हा अपघात मंगळवार, दि. ९ रोजी पहाटे तीन ते चारच्या सुमारास झाला. सुभाष बाबूराव पाटील व प्रवीण नामदेव टेगिमाळी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणारी कार (एमएच १० सीएक्स ९८०७) च्या चालकाने जोशी विहीर उड्डाण पुलावर समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील दहाजणांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मदतकार्य करून उपचारासाठी सातारा येथे घेऊन जात असताना दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सुभाष बाबूराव पाटील (वय ७१, रा. बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली) व प्रवीण नामदेव टेगिमाळी (१८, रा. दत्त कॉलनी, जत, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला, तर महेश महादेव नवाळे (४२), शुभांगी महेश नवाळे (३२), शबाना मोहम्मद पठाण (३८, तिघे रा. विटा, जि. सांगली), प्रणव दीपक लोंढे (२१, रा. वाळुंज, ता. खानापूर, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्वजण व्यापारी असून ते कावीळ रोगावरील औषधोपचारासाठी नाशिक येथे निघाले होते.

अपघाताची माहिती मिळताच वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जाणवे-खराडे, भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस हवालदार शिवाजी तोडरमल, राजकुमार खताल यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

फोटो

०९पाचवड -ॲक्सिडेंट

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील जोशी विहीर येथे मंगळवारी पहाटे ट्रकला कारची धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. (छाया : महेंद्र गायकवाड)