शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

वाईच्या महागणपती मंदिरात दोन फूट पाणी

By admin | Updated: August 7, 2016 01:04 IST

देवदर्शन बंद : कृष्णानदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या जलपर्णी

सातारा : वाई येथील कृष्णा काठच्या महागणपती मंदिरात पाणी शिरले. भाविकांसाठी दर्शन बंद झाले असून, तीन वर्षांनंतर प्रथमच ‘कृष्णामाई’ दुथडी भरून वाहू लागली. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सात धरणांमधून जवळपास पाऊण लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने साताऱ्याच्या स्मशानभूमीतही पाणी शिरले.वाईचे महागपती मंदिर दोन फूट पाण्यात असून, मंदिरा समोरील पूलही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाई शहरातील सर्व वाहतूक जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सुरू आहे. धोम-बलकवडी धरणातून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, कृष्णा नदीतील सर्व जलपर्णीही वाहून गेली आहे.दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर शनिवारीही कायम असून, धरणात ८२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने कोयनेच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यास शनिवारी सकाळी सुरुवात केली. २,१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान, कोयना नदीतील पाणीपातळी वाढल्याने संगमनगर धक्का पूल शनिवारी दुपारपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलापलीकडील ३३ गावे संपर्कहीन झाली आहेत. (प्रतिनिधी)