शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

विनायक राऊतांना दोन दिवसांची मुदत; वक्तव्य मागे घ्या, अन्यथा...

By नितीन काळेल | Updated: May 28, 2023 20:09 IST

शंभूराज देसाईंचा इशारा : अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे खोटे

नितीन काळेल सातारा : ‘ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे केलेले वक्तव्य धांदांत खोटे आहे. त्यामुळे राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,’ असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. तसेच सुरतला गेलो तेव्हाच मातोश्रीची दारे बंद केल्याचाही पुनुरुच्चार केला.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘गेल्यावर्षी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उध्दव ठाकरे परिवारासाठी अर्धा सेकंदही माझे बोलणे झालेले नाही. तसेच कोणा त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य १००१ टक्के खोटे आहे. महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. त्यानंतर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पाटण दाैऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. याचा समाचारही देसाई यांनी खरपूस शब्दात घेतला. अजित पवारांचे भाषण हे नैराश्येतून केल्याचे दिसून आले. कारण, त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यात एखादं-दुसरं बॅनर दिसलं. तर पाटणमध्ये एकच स्वागत कमान दिसून आली. सभागृहातही २ हजारांपेक्षा अधिक माणसे एेकण्यासाठी नव्हती. मागील सहा महिन्यांत तर सत्यजित पाटणकरांचे दोन मोठे पराभव केलेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि पाटणकर गटही गलितग्रस्त झालाय, असेच एकप्रकारे देसाईंनी सुनावले. तसेच निधीबद्दलही पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री देसाई यांनी अडीचवर्षे ते उपमुख्यमंत्री आणि अऱ्थमंत्री होते. मी अऱ्थराज्यमंत्री होतो. तरीही त्यांनी बारामतीला किती निधी नेला ते बघावे, असे अजित पवार यांना आव्हान दिले. तर कऱ्हाड-चिपळूण रस्त्याचेही काम सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांचे भाषण हे दर्जा घसरलेले असेच होते. तरीही त्यांची आणि माझी मैत्री आहे. ते असेच बोलत राहिले तर मी यापेक्षा अधिक बोलणार, असा इशाराही देसाईंनी यावेळी दिला.

पत्रा चाळेची टांगती सुरी...

खासदार संजय राऊत यांची सकाळची भुणभुण एेकायची सवय अजित पवार यांना असावी अशी टीका करतानाच मंत्री देसाईंनी राऊतांच्या डोक्यावर पत्रा चाळीची टांगती सुरी आहे. ती कधी खाली येईल ते समजणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीकेच्या प्रश्नावर देसाई यांनी पवार हे मोठे नेते आहे. जमालगोटा शब्द ग्रामीण भागात वापरतात. हे त्यांना माहीत नसावे असा टोला लगावला.

 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना