शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अडीच लाख वाहने जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वाढते अपघात व प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने पंधरा आणि वीस वर्षे पूर्ण झालेली वाहने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वाढते अपघात व प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने पंधरा आणि वीस वर्षे पूर्ण झालेली वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकाचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात भंगारात जाणारी २ लाख ७९ हजार १७२ वाहने आहेत. ही सर्व वाहने नव्या नियमानुसार भंगारात घालावी लागणार आहेत.

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: अपघाताला जुनी वाहने कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सुस्थितीत वाहने नसल्यामुळे ब्रेक फेल, स्टेरिंग लॉक, इंजिन नादुरूस्त अशा विविध प्रकारच्या तक्रारी येतात. त्यातच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व बाबी विचारात घेऊन राज्य शासनाने जुनी वाहने स्क्रॅपमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला, तरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अद्याप याबाबत कोणत्याही सूचना अथवा आदेश आलेला नाही. परंतु पंधरा वर्षे पूर्ण झालेली वाहने ज्यांच्याकडे आहेत, अशा लोकांना आता हुरहूर लागली आहे. या वाहनांचे पासिंग पुन्हा होणार का, या विचारात अनेकजण आहेत. अनेक गाड्या तीस ते पस्तीस वर्षे सलग वापरात आहेत. या वाहनांवर कोणी कारवाई करत नाही, असा वाहनचालकांचा समज झाल्यामुळे ते जुनीच वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील वाहनांची संख्या

८ लाख ६४ हजार

स्क्रॅपला जाणाऱ्या वाहनांची संख्या

२ लाख ७९ हजार १७२

चौकट : आत्तापर्यंत काय होता नियम

पंधरा वर्षांपर्यंत नवीन वाहन रस्त्यावरून चालविण्यास परवानगी असते. पंधरा वर्षांनंतर पासिंग केल्यास संबंधित गाडीला आणखी पाच वर्षांचा कालावधी वाढवून दिला जातो. त्यानंतर मात्र गाडी कोणतीही असो, ती रस्त्यावर चालवणे गुन्हा आहे. अशा गाड्या स्क्रॅप होतात आणि नंतर भंगारात घालाव्या लागतात.

कोट : जुन्या गाड्या केवळ पंधरा वर्षांपर्यंत वापरता येतात. मात्र, नवीन नियम अद्याप आलेला नाही. शासनाकडून परिपत्रक आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा